शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘ती फुलराणी’त रसिकांना फुटला घाम

By admin | Updated: April 15, 2016 01:27 IST

गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका

कल्याण : गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका गुरुवारी नाट्यरसिकांना बसला. ‘ती फुलराणी’ नाटकावेळी रसिकांसोबत कलाकारही घामाघूम झाले. मध्यंतरावेळी रसिकांचा पारा चढल्याने तासभर प्रयोग सुरू होऊ शकला नाही. संतप्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घातला. काही प्रेक्षकांनी पैसे परत मागितले, तर काहींनी प्रयोग तसाच सुरू ठेवण्याची मागणी केल्याने गोंधळ वाढला. अखेर, कसाबसा एसी सुरू करून पालिकेने आपली सुटका करून घेतली. पण, यामुळे पालिकेच्या ताब्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला. अत्रे रंगमंदिरात सायंकाळी साडेचार वाजता ‘ती फुलराणी’चा प्रयोग होता. त्याला २७० प्रेक्षक हजर होते. पहिला अंक सुरू असतानाच प्रेक्षकांना, कलाकारांना उकाड्याचा त्रास होऊ लागला. मध्यंतर होताच प्रेक्षकांनी त्याचा जाब विचारला आणि जोवर एसी सुरू होत नाही, तोवर प्रयोग सुरू न करण्याचा मुद्दा लावून धरला. सुविधा देता येत नसतील, तर तिकिटाचे पैसे परत करा. खेळ थांबवा. आमचा रसभंग झाला आहे, असे मुद्दे तावातावाने मांडले. नाटकाचे निर्माते धनंजय चाळके यांनी ज्या प्रेक्षकांना पैसे परत हवे असतील, त्यांना पैसे परत केले जातील, असे स्टेजवरून जाहीर केले. काही प्रेक्षकांनी प्रयोग बंद करण्याची मागणी केली, तर काहींनी एसी सुरू करून पुढचा अंक सादर करण्याची भूमिका घेतल्याने प्रेक्षकांतच दोन तट पडले. ते हमरीतुमरीवर आल्याने कलाकारही अस्वस्थ झाले. (प्रतिनिधी)व्यवस्थापकांचा दोषअखेर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक स्टेजवर आले. एसी नादुरुस्त असल्याचा फटका कलाकारांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले आणि यात नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांचा दोष असल्याचे मत मांडले. मात्र, संतापलेल्या काही प्रेक्षकांनी ओक यांनाही बोलू दिले नाही. तोवर, कसाबसा एसी सुरू करून नाटकाचा पुढचा अंक सुरू झाला. तोवर, काही प्रेक्षक बाहेर पडले. त्यांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. आमचा विरोध नाटकाला नाही, तर गैरव्यवस्थापनाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी बाजारपेठ ठाण्यातील पोलीस आले. या नाटकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सचिव सुभाष भुजबळ उपस्थित होते. पण, त्यांनी वादात मध्यस्थी केली नाही. प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असताना नाट्यगृहाचे व्यवस्थापक समोर आले नाहीत की, त्यांनी बाजू मांडली नाही.