शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘ती फुलराणी’त रसिकांना फुटला घाम

By admin | Updated: April 15, 2016 01:27 IST

गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका

कल्याण : गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका गुरुवारी नाट्यरसिकांना बसला. ‘ती फुलराणी’ नाटकावेळी रसिकांसोबत कलाकारही घामाघूम झाले. मध्यंतरावेळी रसिकांचा पारा चढल्याने तासभर प्रयोग सुरू होऊ शकला नाही. संतप्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घातला. काही प्रेक्षकांनी पैसे परत मागितले, तर काहींनी प्रयोग तसाच सुरू ठेवण्याची मागणी केल्याने गोंधळ वाढला. अखेर, कसाबसा एसी सुरू करून पालिकेने आपली सुटका करून घेतली. पण, यामुळे पालिकेच्या ताब्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला. अत्रे रंगमंदिरात सायंकाळी साडेचार वाजता ‘ती फुलराणी’चा प्रयोग होता. त्याला २७० प्रेक्षक हजर होते. पहिला अंक सुरू असतानाच प्रेक्षकांना, कलाकारांना उकाड्याचा त्रास होऊ लागला. मध्यंतर होताच प्रेक्षकांनी त्याचा जाब विचारला आणि जोवर एसी सुरू होत नाही, तोवर प्रयोग सुरू न करण्याचा मुद्दा लावून धरला. सुविधा देता येत नसतील, तर तिकिटाचे पैसे परत करा. खेळ थांबवा. आमचा रसभंग झाला आहे, असे मुद्दे तावातावाने मांडले. नाटकाचे निर्माते धनंजय चाळके यांनी ज्या प्रेक्षकांना पैसे परत हवे असतील, त्यांना पैसे परत केले जातील, असे स्टेजवरून जाहीर केले. काही प्रेक्षकांनी प्रयोग बंद करण्याची मागणी केली, तर काहींनी एसी सुरू करून पुढचा अंक सादर करण्याची भूमिका घेतल्याने प्रेक्षकांतच दोन तट पडले. ते हमरीतुमरीवर आल्याने कलाकारही अस्वस्थ झाले. (प्रतिनिधी)व्यवस्थापकांचा दोषअखेर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक स्टेजवर आले. एसी नादुरुस्त असल्याचा फटका कलाकारांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले आणि यात नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांचा दोष असल्याचे मत मांडले. मात्र, संतापलेल्या काही प्रेक्षकांनी ओक यांनाही बोलू दिले नाही. तोवर, कसाबसा एसी सुरू करून नाटकाचा पुढचा अंक सुरू झाला. तोवर, काही प्रेक्षक बाहेर पडले. त्यांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. आमचा विरोध नाटकाला नाही, तर गैरव्यवस्थापनाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी बाजारपेठ ठाण्यातील पोलीस आले. या नाटकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सचिव सुभाष भुजबळ उपस्थित होते. पण, त्यांनी वादात मध्यस्थी केली नाही. प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असताना नाट्यगृहाचे व्यवस्थापक समोर आले नाहीत की, त्यांनी बाजू मांडली नाही.