शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:20 AM

काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत.

ठाणे : काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत. या पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टिटवाळ्यानजीकच्या रुंदे गावच्या पुलावरून काळू नदीचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे १२ गावांचा संपर्क तुटला. कल्याणमधील गणेशघाट येथे अडकलेल्या दोन महिला, एक पुरुष आणि काही बकºयांची केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने सुखरुप बाहेर काढले.हवामान खात्याने सोमवार व मंगळवारी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तलाव क्षेत्रातही पावसाचा जोर असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहापूरच्या किन्हवली गावाजवळील संगमेश्वर हे प्राचीन मंदिरात काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले. तेथील पुजाºयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. याच नदीचे पाणी कल्याण तालुक्यातील रुंद गावाजवळच्या पुलावरून वाहत आहे. यामुळे फळगाव, वासुंद्री आदी १२ गावांचा टिटवाळ्याशी संपर्क तुटला आहे. या काळू नदीच्या पुरामुळे मुरबाड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीसह ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक मंदावली. माळशेज घाटातही पाऊस असून दाट धुके आहे. यामुळे घाटातील वाहतूक काही अंशी खोळंबली असून चालकांना दिवे लावून वाहन चालवण्याचा प्रसंग ओढवला आहे.भिवंडीजवळील माणकोली पुलाचे अर्धवट काम असल्यामुळे या पावसात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी झाली. चालकांना तासन्तास एकाच जागेवर उभे राहण्याचा प्रसंग ओढवला.ठाणे शहरात घोडबंदर रोडवर परिसरातील रहिवाशांना घरी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाणे खाडीसह नागलाबंदर, घोडबंदर खाडीत सुमारे ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने व्यक्त केल्यामुळे खाडीकिनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.ठाणे शहर परिसरात ठिकठिकाणी किरकोळ दोन आगीच्या घटना घडल्या. पाच झाडे पडली. पाणीपुरवठा करणाºया पाइपलाइनला एका ठिकाणी गळती लागली. ठाणे शहरात सकाळी ८ वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत ५१.५८ मिमी पाऊस पडला. लोकलगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, मात्र सुटीचा दिवस असल्यामुळे फार परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उल्हासनगर शहरात ८९ मिमी, मुरबाडला ७९, अंबरनाथला ७०, कल्याणला ६३, शहापूरला ५८, ठाण्याला ३७ आणि सर्वात कमी भिवंडी तालुक्यात २५ मिमी पाऊस मागील २४ तासांच्या कालावधीत पडला.>स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौक परिसरातील मुरलीवाला कॉम्प्लेक्स इमारतीचा तिसºया मजल्याचा स्लॅब रविवारी संध्याकाळी कोसळला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर दोन मुले जखमी झाली. मुलांवर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरू असून ही इमारत रिकामी करण्यात येत आहे.भाटिया चौक परिसरात १९९५ मध्ये मुरलीवाला कॉम्प्लेक्स ही चार मजली इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील रुम नं. ३०३ चा स्लॅब दुसºया मजल्यावरील रुम नं. २०३ वर सायंकाळी कोसळला. त्यावेळी नीना भरत गनवानी या हॉलमध्ये दोन मुलांसह बसल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर स्लॅब पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांची २३ आणि १८ वर्षांची दोन मुले गंभीर जखमी झाली.महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, स्थानिक नगरसेवकांसह नायब तहसीलदार गवई यांनी घटनास्थळी धाव घेतली. नीना गनवानी यांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. शिंपी यांनी इमारत रिकामी करण्यास सुरुवात केली असून इमारतीत एकूण १६ प्लॉट, तर चार दुकाने आहेत. येथील रहिवाशांची नातेवाइकांकडे तर काहींची राहण्याची सोय महापालिका करणार असल्याची माहिती शिंपी यांनी दिली. तसेच भाटिया चौकातून कुर्ला कॅम्पकडे जाणारा एकीकडचा रस्ता बंद केला आहे.>धरणक्षेत्रात दमदारपाणीपुरवठा करणाºया धरण क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील वर्षीच्या तुलनेत मात्र भातसा धरणात आजपर्यंत सुमारे सहा टक्के कमी साठा आहे. मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. बारवी धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला. मागच्या वर्षी ६९ टक्के होता. मुंबईसह ठाण्यास पाणीपुरवठा करणाºया व सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणात आज ९० मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत एक हजार १३६ मिमी पाऊस या धरणात पडला. मोडकसागरमध्ये आतापर्यंत एक हजार २९१ मिमी पाऊस पडला. १६२.७२ मीटर पाण्याची पातळी असलेले हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तानसा धरणात मात्र ८०.५६ टक्के पाणीसाठा असून, आंध्रा धरणात ५३ मिमी पाऊस पडला. या धरणात ४३ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी ४४ टक्के होता. मात्र, या उल्हास नदी खोºयातही पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे या धरणात पाणीसाठा वाढतो आहे.