शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:15 PM

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. 

ठळक मुद्दे'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरणबालकलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : 'झेंडा हरवला आहे' म्हणजे देशात अनेक रंगांच्या झेंड्यामध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे त्याचा शोध.कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणं लागतो अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतीतून समाजप्रबोधन करण्यात आले आहे.प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर परेश दळवी लिखीत आदित्य नाकती दिग्दर्शित 'झेंडा हरवला आहे' ही एकांकिका सादर करण्यात आली.

         भारत देशाचा इतिहास अभूतपूर्व आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे त्यागाचे प्रतीक आहे आपण अनुभवत असलेलं स्वातंत्र्य.परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळवल्यानंतर आजही आपण अनेक झेंड्याच्या नेतृत्वाखाली विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी मानसिक गुलामगिरीत घुसमटत जगत आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या तिरंग्याचे अस्तित्व विसरून गेलो आहोत. त्यातील रंग हे फक्त धार्मिक अर्थाने न घेता केशरी म्हणजे त्याग बलिदान पांढरा म्हणजे शांती,हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि निळे अशोक चक्र हे २४ तास प्रगतीशील राहण्यास प्रेरणा देणारे आहे ह्याचा विसर पडून आपण जणू आंधळेपणाने वावरत आहोत.अशाच देशातील अनेक झेंड्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे 'झेंडा हरवला आहे'..बाहेरील आतंकवादापेक्षा दिशाहीन तरुणपिढी अनेक रंगामध्ये विभागला जाऊन दंगली मोर्चे  अशा अंतर्गत आतंकवादाला कारणीभूत ठरतोय त्यांना खऱ्या झेंड्याची तिरंग्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'झेंडा हरवला आहे'.फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशा साठी त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावं हा संदेश म्हणजे 'झेंडा हरवला आहे' एकांकिका.सदर एकांकिका सहदेव साळकर,ओमकार मराठे,महेश झिरपे,अमोघ डाके ह्या कलाकारांनी सादरीकरण केले.सदर सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. यासोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी कदिर शेख दिग्दर्शित  'ये मेरे वतन के लोगो' आणि 'ये वतन वतन' ह्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. सदर सादरीकरणात आदित्य नाकती,परेश दळवी,राजन मयेकर,शनि जाधव,धनेश चव्हाण,वैभव पवार,आतिश जगताप,संज्योत बावीसकर,उत्तम ठाकुर,शुभम कदम,कुंदन भोसले,रोहित सुतार,महेश झिरपे,सहदेव कोळंबकर,वैभव चव्हाण,न्युतन लंके,विजया साळुंके आणि रोहिणी थोरात  ह्या कलाकारांनी सहभाग घेतला.

      तसेच, महाराष्ट्रातील विविधतेतील एकता ह्या संकल्पनेवर आधारित परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरण अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये,अमोघ डाके,अर्णय वाघ,अद्वैत मापगावकर,अस्मि शिंदे,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,प्रथम नाईक,रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर कट्टा क्रमांक ४१३ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई