शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या पाच शाळा बंद, पटसंख्येला लागली घरघर, चार शाळांचा निर्णय तूर्तास स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:05 IST

केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

कल्याण : केडीएमसीच्या शाळांची पटसंख्या घटल्याने त्या बंद करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. पाच शाळा गुरुवारी बंद करण्यात आल्या. अन्य चार शाळांचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढता विरोध पाहता त्यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महिनाअखेरीस पुन्हा पटसंख्येचा आढावा घेतला जाणार असल्याने या शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करत शाळा क्रमांक २३ नवापाडा (डोंबिवली पश्चिम), क्रमांक १४ काटेमानिवली, क्रमांक ६५ आनंदवाडी क्रमांक (दोन्ही कल्याण पूर्व), ८२ ब्राम्हण सभा परिसर, क्रमांक ८३ रामचंद्र टॉकिज (दोन्ही डोंबिवली पूर्व) अशा पाच शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना लगतच्या अन्य शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, शाळा क्रमांक ४२ गौरीपाडा, क्रमांक ४ रामबाग, क्रमांक ५४ मोहिली, क्रमांक ६ हनुमाननगर या चार शाळाही बंद करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले होते. परंतु, कल्याण पश्चिम भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन या शाळेची पटसंख्या चांगली असल्याकडे लक्ष वेधले होते. या शाळेत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले शिकतात. शाळा बंद झाल्यास त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल. तरीही शाळा बंद केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कल्याण या संघटनेचे पदाधिकारी निलेश वाबळे, नरेंद्र सोनजे आणि भगवान हमरे यांनीही नार्वेकर आणि शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांची भेट घेऊन संबंधित निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिका शाळांमध्ये सर्वसाधारणपणे गरीब विद्यार्थी शिकतात. शिक्षकांनी सर्वेक्षण करून हे विद्यार्थी गोळा केले आहेत. ऐन शालेय वर्ष सुरू असताना शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी योग्य नसल्याकडे संबंधित पदाधिकाºयांनी लक्ष वेधले होते. काही शाळांची पटसंख्या चांगली असताना त्या बंद करण्याचा निर्णय कसा काय घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.दरम्यान, शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांची बैठक घेत शाळा बंद करण्याचा निर्णय कळविला. त्यावेळी त्यांनी नऊपैकी चार शाळांचा निर्णय स्थगित केला जात असल्याचेही स्पष्ट करत तेथील शिक्षकांना शाळेत रुजू होण्याच्या सूचना केल्या.‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही’पटसंख्या कमालीची घटल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यात तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. सध्या पाच शाळा बंद केल्या आहेत. उर्वरित चार शाळांचा आढावाअंती निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी