शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पिस्टल आणि चॉपरसह डायघरमधून पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:11 IST

गोळीबार न करताही केवळ आवाज आणि अग्निनिर्मिती करणाऱ्या एक पिस्टल, काडतुसे आणि चॉपर बाळगणा-या पाच जणांना आचारसंहिता पथकाने शनिवारी पहाटे अटक केली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देठाण्यात आचारसंहिता पथकाची कारवाईशीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा पाचही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

ठाणे: निवडणूक आचारसंहिता पथकाने शीळ महापे रोडवरून शनिवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास एका कारमधून ब्लँक फायर करणारे (गोळीबाराऐवजी केवळ आवाज करणारे) पिस्टल आणि सात ब्लँक काडतुसासह एक चॉपर जप्त केले. याप्रकरणी नागेश कुसकर (३१), सर्वेश किनळेकर (२२), अक्षय लष्कर (२२), सुबोध कदम (२३) आणि राजू मोरे (४२, सर्व रा. डोंबिवली) या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आवाजाबरोबर केवळ आग निर्मिती करणारे हे पिस्टल आहे. निवडणुकीच्या काळात कोणतेही शस्त्र बाळगण्यास पोलीस आयुक्तांची मनाई आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पथकाकडून २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पद वाहनांची शीळ महापे रस्त्यावर तपासणी करण्यात येत होती. महापे येथून कल्याण फाटयाकडे निघालेल्या एका कारचीही या पथकाने तपासणी केली. तेंव्हा कारच्या मागील सीटच्या उजव्या बाजूस एक लोखंडी चॉपर मिळाला. त्यापाठोपाठ चालक सीटच्या दरवाजाच्या कप्यात एक विदेशी बनावटीचे पिस्टलही मिळाले. त्याबाबत कारमधील किनळेकर यांच्यासह कोणीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे या कारसह ही शस्त्रसामुग्रीही जप्त करण्यात आली. एक लाख ६५ हजार रुपयांचे हे पिस्टल असून एक हजार रु पयांची सात काडतुसे आहेत. भरारी पथकाच्या प्रमुखाने दिलेल्या तक्र ारीनंतर शीळ डायघर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागेश याची ही पिस्टल असून त्याने एका कंपनीकडून कायदेशीररित्या खरेदी केल्याचा दावा केला आहे. अर्थात, निवडणुकीच्या काळात ती जवळ बाळगण्याला मनाई आहे. आरोपी वाढिदवसाच्या कार्यक्र मासाठी जात होते. मात्र, उशिर झाल्याने पुन्हा परतत असताना ते आचारसंहिता पथकाच्या तावडीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस