शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

निष्काळजीपणा करणारे पाच बिल्डर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:21 IST

अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत मिळून आल्याच्या घटनेला तब्बल २० दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ड्रेनेज टाकीवर झाकण न बसवून निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच बिल्डरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

डोंबिवली : अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत मिळून आल्याच्या घटनेला तब्बल २० दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ड्रेनेज टाकीवर झाकण न बसवून निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच बिल्डरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. कल्याण न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेल्या बिल्डरांची नावे सय्यद हसन अहमद, मोनिस अहमद, ऐमान खान, नागेंद्र सिंग आणि विशाल सिंग अशी आहेत. अथर्वचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता किंवा कसे, याबाबतचा तपास अजून सुरू असून मानपाडा पोलीस ठाण्यात प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, अपहरणकर्त्याचा अजून तपास लागलेला नाही. तत्पूर्वी पाच बिल्डरांना निष्काळजीपणाकरिता अटक झाली आहे.दि. २४ मे रोजी दुपारच्या सुमारास अथर्व बेपत्ता झाला. त्याच्या आईवडिलांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. अथर्व हरवल्याची तक्रार त्याच्या आईवडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली.पोलिसांनी शोध घेतला असता देसलेपाडा येथील अथर्वच्या घरानजीक नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत त्याचा मृतदेह मिळून आला. ड्रेनेज टाकीवर झाकण नसल्याने खेळताखेळता त्यात पडून अथर्वचा मृत्यू झाला की, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचा खून करून त्याचा मृतदेह ड्रेनेज टाकीत फेकून देण्यात आला, या दोन्ही शक्यतांच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात पाठवला असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सरकारी रुग्णालयात पाठवला होता. पोलिसांनी अथर्वच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मात्र, तब्बल २० दिवसांनी ड्रेनेजलाइनचे झाकण उघडे ठेवल्याबद्दल पाच बिल्डरांना अटक केली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस एवढे दिवस गप्प का बसले, असा सवाल नागरिक करत आहेत. ही इमारत अधिकृत की अनधिकृत, याचाही तपास पोलीस करणार आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना सात बेकायदा मजले नियमित करण्याकरिता आठ लाखांची लाच घेताना दोन दिवसांपूर्वी अटक केली. देसलेपाडा येथील या इमारतीलाही महापालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांनी संरक्षण दिले होते किंवा कसे, या दृष्टिकोनातूही तपास केला जाणार आहे.अथर्ववर लैंगिक अत्याचार झाले नाही व त्याचा अगोदर खून करून त्याला ड्रेनेजमध्ये टाकले नाही, असा शवविच्छेदन अहवाल मुंबईहून आला, तर हे बिल्डरच त्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निष्पन्न होईल.>पोलीस खरे कारण शोधू शकलेले नाहीअथर्वचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे व त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले, तर केवळ निष्काळजीपणाकरिता बिल्डरांना दोषी धरले जाईल. मुलाच्या मृत्यूला २० दिवस उलटले, तरी पोलीस मृत्यूचे खरे कारण शोधू शकलेले नाहीत, हे पोलिसांचे सपशेल अपयश असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मुंबईहून येणाºया शवविच्छेदन अहवालामध्ये नेमके काय असेल याकडे अथर्वचे पालक आणि त्याच्या कुटुंबीयांचे लक्ष लागलेले आहे. तो आल्यानंतरच नेमका प्रकार पुढे येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.>दि. २५ रोजी माझ्या मुलाचा, अथर्वचा मृतदेह ड्रेनेज टाकीत मिळून आला. ड्रेनेजलाइन उघडी ठेवणे, त्यावर झाकणे न बसवणे, याकरिता बिल्डरांना अटक करायचीच होती, तर त्याच वेळी का केली नाही? तब्बल २० दिवस थांबण्याची गरज काय होती? पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात दिरंगाई का केली जात आहे. माझ्या मुलाचा खरा मारेकरी अद्याप शोधलेला नाही. त्याच्या मृत्यूचे खरे कारण उघड झालेच पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.- रोशना वारंग, अथर्वची आई

टॅग्स :Arrestअटक