शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

भीषण आगीत मच्छीमार बोट खाक; ३० लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 10:20 IST

Mira Road: भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली.

मीरारोड  - भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. पातान बंदरात किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर मासेमारी बोटी नांगरल्या जातात. त्यात पातान बंदर येथील मच्छीमार सिरील घावट्या यांची पवित्र मारिया ऊर्फ राजश्री नावाची मासेमारी बोटसुद्धा नांगरलेली होती.  

शुक्रवारी (दि. २६) समुद्रात उभ्या असलेल्या बोटीला अचानक आग लागली. बोटीवर मासेमारीची नायलॉन जाळी मोठ्या प्रमाणात असल्याने आग पटकन  पकडून काळ्या धुराचा मोठा लोट उडाला. तेव्हा किनाऱ्यावरील मच्छीमारांना आग लागल्याचे लक्षात आले. काही मच्छीमारांनी मदतीसाठी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. 

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मासेमारी बोटीवरील आग पूर्णपणे आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत बोट खाक झाली होती.मासेमारीची जाळी, जीपीएस व वायरलेस यंत्रणा, मासळी साठवण्याचे शीतगृह, बोटीवरील तांडेलची केबिन व खलाशांची राहण्याची जागा, किराणा सामान खाक झाल्याची नोंद अग्निशमन दलाने केली आहे. तसेच बोटीच्या लाकडी भागाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोडfireआग