शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाईंदरमध्ये वीज कोसळून मच्छीमाराचा मृत्यू, ६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 3:43 PM

यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्र किनारी प्रातःविधी साठी गेलेल्या मच्छीमारांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ६ जण किरकोळ जखमी झाले. यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता. स्टॅनी इनास अदमनी ( ६६ ) असे निधन झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन - पाली - चौक परिसरातील बहुतांश मच्छीमार समुद्र किनारी प्रातः विधीसाठी जातात . पातान बंदर येथे राहणारे स्टॅनी देखील घराच्या मागील समुद्र किनारी सवयी प्रमाणे सकाळी साडे सहाच्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले होते . त्यावेळी अन्य मच्छीमार देखील प्रातःविधी आदी साठी आले होते . 

वादळ - विजेचा कडकडाट सुरु असतानाच अचानक प्रचंड आवाज होऊन वीज कोसळली .  स्टॅनी यांच्या वर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले . तर त्या ठिकाणी असलेले रोहन राजेश पोशापीर , गिल्डर खोपटकर , राजेश पिला, सनी पिला आदी जखमी झाले .वीज पडताच सर्वांचा जिवाच्या भीतीने थरकाप उडाला . परंतु पावसाची रिमझिम व किनारा ओला असल्याने  काहींना विजेचे झटके बसले . आवाज तर इतका मोठा होता कि कानठळ्या बसल्या . तासभर तर काहींचे कान सुन्न झाले होते . 

जखमींना जमेल तसे लगतच्या डॉक्टारां कडे उपचारासाठी नेण्यात आले . मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती देत आवश्यक मदतकार्य सुरु केले . तहसीलदार अधिक पाटील यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेचा आढावा घेऊन शासना कडून  शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले . उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी घटना स्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . 

वीज कोसळल्याने येथील काही घरां मधील विजेची उपकरणं बंद पडली . तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता .  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  उत्तन परिसरातील मच्छीमारांनी समुद्र किनारी उघड्यावर प्रातःविधी साठी जाऊ नये असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी केले आहे .