शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:50 IST

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे.पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे.

ठाणे - मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा या शिल्पाच्या माध्यमातून साकारली असल्याने त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र माझा’ असे नाव असलेल्या चित्रशिल्पामध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, जोतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर  यांचे भित्तीचित्र शिल्प चितारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या भित्तीचित्रशिल्पाची निर्मिती प्रथमच मुंब्रा रेतीबंदर येथे करण्यात आलेली आहे. चित्रशिल्पकार केदार घाटे यांनी या चित्रशिल्पाची निर्मिती केली आहे. रविवारी (9 जून) चित्रशिल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. 

चित्रशिल्पाच्या अनावरणानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी 'हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारीत करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालविण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले ते भोसल्यांचे नव्हते. तर ते स्वराज्य होते. 18 पगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता' असं म्हटलं  आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिवराय-फुलेंच्या समानतेच्या विचारांचा विद्रोह जागवला होता. हे या चित्रशिल्पांच्या माध्यमातून आव्हाड यांनी दाखविले असतानाच या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे. या दोन स्त्रिया म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले.  आज आपण स्त्रीच्या सबलीकरणाबाबत बोलत आहोत. पण, महिलांच्या सबलीकरणाचा आदर्श साडेतीनशे वर्षांपूर्वी मा जिजाऊंनीच दिला आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा महायज्ञ पेटवला आहे. आज आपण शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी अपेक्षा बाळगतो. पण, त्यासाठी आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याची गरज आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. कारण, महाराष्ट्राचा विकास ज्या विचारांवर झाला. किंवा अधिकची प्रगती ज्या विचारांवर होईल, ते विचार या चित्रशिल्पातून आव्हाड यांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले आहेत. शिवरायांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते. आज जर हाच विचार आताच्या सत्ताधार्‍यांनी अवलंबला असता तर महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता असंही ते म्हणाले. 

दरम्यान आव्हाड यांनी यावेळी चित्रशिल्पाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विनयशील शिवराय, जिजाऊ, संत तुकाराम, जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांचे विचार सांगितले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, मनोहर साळवी, महेश साळवी, नगरसेवक अश्रफ पठाण,  नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते  मनिषा साळवी, आरती गायकवाड, रुपाली गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड