शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे दिमाखदार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 15:50 IST

मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे.पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे.

ठाणे - मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम, जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा या शिल्पाच्या माध्यमातून साकारली असल्याने त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखविणारे महाराष्ट्रातील पहिलेच चित्रशिल्प याच ठिकाणी चितारण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र माझा’ असे नाव असलेल्या चित्रशिल्पामध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, जोतिराव फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर  यांचे भित्तीचित्र शिल्प चितारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या भित्तीचित्रशिल्पाची निर्मिती प्रथमच मुंब्रा रेतीबंदर येथे करण्यात आलेली आहे. चित्रशिल्पकार केदार घाटे यांनी या चित्रशिल्पाची निर्मिती केली आहे. रविवारी (9 जून) चित्रशिल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. 

चित्रशिल्पाच्या अनावरणानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी 'हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारीत करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालविण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले ते भोसल्यांचे नव्हते. तर ते स्वराज्य होते. 18 पगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता' असं म्हटलं  आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी शिवराय-फुलेंच्या समानतेच्या विचारांचा विद्रोह जागवला होता. हे या चित्रशिल्पांच्या माध्यमातून आव्हाड यांनी दाखविले असतानाच या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे. या दोन स्त्रिया म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले.  आज आपण स्त्रीच्या सबलीकरणाबाबत बोलत आहोत. पण, महिलांच्या सबलीकरणाचा आदर्श साडेतीनशे वर्षांपूर्वी मा जिजाऊंनीच दिला आहे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा महायज्ञ पेटवला आहे. आज आपण शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी अपेक्षा बाळगतो. पण, त्यासाठी आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याची गरज आहे. जितेंद्र आव्हाड यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. कारण, महाराष्ट्राचा विकास ज्या विचारांवर झाला. किंवा अधिकची प्रगती ज्या विचारांवर होईल, ते विचार या चित्रशिल्पातून आव्हाड यांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले आहेत. शिवरायांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते. आज जर हाच विचार आताच्या सत्ताधार्‍यांनी अवलंबला असता तर महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता असंही ते म्हणाले. 

दरम्यान आव्हाड यांनी यावेळी चित्रशिल्पाची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विनयशील शिवराय, जिजाऊ, संत तुकाराम, जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांचे विचार सांगितले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, मनोहर साळवी, महेश साळवी, नगरसेवक अश्रफ पठाण,  नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते  मनिषा साळवी, आरती गायकवाड, रुपाली गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.  

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड