पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना
By Admin | Updated: October 16, 2014 01:08 IST2014-10-16T00:23:39+5:302014-10-16T01:08:42+5:30
पारंपारिक पद्धतीने येथील कुंभारवाड्यात बनविण्यात येणारे मातीचे किल्ले, मावळे, पणत्या बनविण्यासाठी शेतातील माती मिळणे कठीण झाले आहे

पणती-किल्ल्यांसाठी माती मिळेना
विनायक बेटावदकर, कल्याण
पारंपारिक पद्धतीने येथील कुंभारवाड्यात बनविण्यात येणारे मातीचे किल्ले, मावळे, पणत्या बनविण्यासाठी शेतातील माती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पणत्या मावळे सारख्या दिवाळी सणाला होणारा व्यवसाय धोक्यात आला आहे.अशी खंत गेले दिडशे वर्षे वंश परंपरागत कुंभार वाड्यात व्यवसाय करणार्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षात कल्याण शहर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. ग्रामीण भागात शेती नष्ट होऊन नगरे,कॉम्प्लेक्स उभी राहिल्याने शेती नष्ट झाली. या शेतातील माती बैलगाड्यांच्या हिशेबात खरेदी करून त्यातून मुलांसाठी किल्ले, मावळे पणत्या बनविण्यात येत.
कुंभारवाड्यात आजही ३५ ते ४० कुटुंबे माती पासून माठ, गणपती बनवण्याचा व्यवसाय करतात. तसेच दिवाळी सारख्या मोसमात पणत्या, मावळे बनवतात त्याना कल्याण प्रमाणेच कर्जत, नाशिक जिल्ह्यातून मोठी मागणी आहे. मोसमात खर्च वजा जाता साधारण प्रत्येक कुटुंबाला २५ ते ३० हजार रु . सुटतात
अलीकडच्या काळात शेतातून येणारी माती मिळणे कठीण झाले. त्यामुळे शाडूच्या मातीचे मावळे,किल्ले बनवण्याची वेळ आली आहे.
कुंभार वाड्यात मंगेश तुपगावकर ,मनोज मुरबाडकर, गीता येलेकर, सुंदर केमबुळकर , कमळाकर तुपगावकर,मधुकर येलेकर,हे मातीची खेळणी म्हणजे शिवाजी महाराज,मावळे,जाती,मातीच्या परड्या बुलाबाई, बनवतात सध्या शेतातील मातीचेखुपचं ॅशार्टेजआहे. त्यामुळे मालाचा पुरवठा करण्यासाठी बाहेरून पणत्या आणाव्या लागतात.माटुंगा,भिवंडी येथे साच्यात बनवलेल्या आधुनिक पद्धतीचे नक्षीकाम केलेल्या रंगी बेरंगी पणत्या कल्याणात बाजारात विक्र ीला आहे.पण हा घाऊक माल आणणारे हे बिगर मराठी आहेत.त्यामुळे आता हा व्यवसायही मराठी माणसाकडून हिरावला जातो का? अशी भीती वाटू लागली आहे.असे गीता येलेकर यांनी सांगितले.त्या गेली तिस-पस्तीत वर्षे बारमाही हा व्यवसाय करतात.
पूर्वी चाकावर मातीचा गोळा ठेउन पणत्या बनवत त्यामुळे ओल्या मातीला निरनिराळे आकार देऊन पणत्या ,माठ सुरया,बनवत ते एक कसब होते.चाक फिरवणे हीसुद्धा कला आहे.,आता ती चाके गेली त्या ऐवजी विजेवर चालणारी चाके आली.शिवाय हाताने वस्तू बनवण्यापेक्षा साच्यातल्या वस्तुत सुबकता असते.सारखेपणा असतो यामुळे ग्राहक तिकडे चटकन आकर्षित होतो.पूर्वी मातीच्या पणत्या एक रात्रभर पाण्यात भिजवाव्या लागत-त्यामुळे तेल कमी लागते.आता पीओपीच्या किंवा शाडू मातीच्या पणत्याना आॅईलपेंट देऊन रंगवून त्यावर नक्षीकाम केलेल्या पणत्या पाण्यात टाकाव्या लागत नाहीत.त्यात निरनिराळे प्रकारही आहेत. दोन रुपया पासून दोनशे रुपयापर्यंत पणत्यांचे दर आहेत. तर पीओपीचे किल्ले तीनशे ते पाचशे रुपया पासून दीड हजारां पर्यंत आहेत.बच्चे कंपनीचे छत्रपती शिवाजी महाराज १० रु पया पासून १५० रु पया पर्यंत साईज प्रमाणे आहेत.भगवा,हिरवा,किरिमजी,सोनेरी वर्ख लावलेल्या सिहासनावर बसलेल्या शिवाजीना बच्चे कंपनीची जशी पसंती आहे.त्याचा प्रमाणे तोफा डागणारे ,घोड्यावर स्वार झालेल्या शत्रूशी युद्ध करणार्या मावळ्याना विशेष मागणी आहे.
साच्यात बनवलेल्या मावळ्यांचे हात तलवारी या मातीतच असतात पण हाताने बनवलेल्या मावळ्यांचे हात पाय मोकळे असतात त्यामुळे त्याना अधिक मागणी आहे.पूर्वी कल्याणात बनवलेले मावळे बाहेरचे दुकानदार घाऊक खरेदी करीत पण आता कुंभारवाड्यातील उद्योजकांना बाहेरून माल खरेदी करून पुरवावा लागतो. (वार्ताहर)