शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

अखेर महापालिका प्रशासनाने नियमबाह्य केलेली करवाढ रद्द करण्याचा घेतला निर्णय   

By धीरज परब | Updated: April 26, 2023 13:23 IST

Mira Bhaindar Municipal Corporation: अंदाजपत्रक मंजूर केल्या नंतर नियमबाह्यपणे मीरा भाईंदरच्या नागरिकांवर पाणी पट्टीत वाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात वाढ करण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने रद्द केला आहे.

- धीरज परब मीरारोड - अंदाजपत्रक मंजूर केल्या नंतर नियमबाह्यपणे मीरा भाईंदरच्या नागरिकांवर पाणी पट्टीत वाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात वाढ करण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने रद्द केला आहे. करवाढ रद्द केल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असून १० टक्के रस्ता कर मात्र कायम राहणार आहे.

महापालिकेत प्रशासन राज असून पालिकेने नागरिकांवर १० टक्के रस्ता कर लावण्याचा तसेच मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ व पालिका सभागृहांच्या भाड्यात वाढ केली होती.

त्या नंतर मार्च मध्ये सादर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात मात्र नागरिकांवर कोणतीही करवाढ केली नव्हती. करवाढ केली नाही म्हणून प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. नंतर मात्र २८ मार्चच्या प्रशासकीय बैठकीत नागरिकांवर नव्याने निवासी वापरा साठी कर योग्य मूल्याच्या १० टक्के व अनिवासी वापरा साठी १५ टक्के इतका पाणी पुरवठा लाभ कर लावला . अग्निशमन सेवा करात अर्धा टक्क्यांनी वाढ करून तो दिड टक्का केला गेला.

पाणी दरात २३ ते ३० टक्के वाढ करत निवासी वापराच्या प्रति हजार लिटर पाण्याचा दर  १३ रुपये वरून १६ रुपये तर वाणिज्य वापराचा दर ५० रुपये वरून ६५ रुपये केला. कहर म्हणजे दरवर्षी पाणीपट्टी  ५ टक्के ने वाढवत नेण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाने घेतला.

सदर करवाढी प्रकरणी महापालिका अधिनियम नुसार नवीन कर आकारणी वा दरवाढ करायची असेल तर २० फेब्रुवारी पर्यंत तसे निर्णय घेतले पाहिजेत. तसेच नवीन कर वा दरवाढ करायची तर ती अंदाजपत्रकातच करणे अपेक्षित असते असे लोकमत ने बातमीत नमूद केले होते.

२०११ साली राज्य शासनाने त्यावेळी महासभेचे झालेले करवाढीचे ठराव हे २० फेब्रुवारी आधी निर्णय न घेतल्याने विखंडीत केले होते. त्यामुळे प्रशासनाच्या २८ मार्च रोजी केलेल्या करवाढीच्या निर्णयांवर विखंडनाची कार्यवाही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. लोकमत ने कायदेशीर बाब मांडल्या नंतर तसेच राजकीय नेते, आजी माजी आमदार, माजी नगरसेवक मात्र करवाढी वर चिडीचूप असल्याची टीका लोकमत मधून उठल्या नंतर राजकारणी हलू लागले.

भाजपा जिल्हाध्यक्ष एड.  रवी व्यास यांनी आयुक्तांना पत्र देऊन नियमांचा हवाला देत करवाढ रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून लेखी निवेदन देत करवाढ रद्द करण्याची संधी केली होती. भाजपा व काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. माजी म्हाडा सभापती व शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर  यांनी करवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

अखेर २८ मार्चच्या प्रधासकीय बैठकीत मंजूर केलेले पाणी पट्टी दरवाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात अर्धा टक्का  वाढ करण्याचे निर्णय मंगळवार २५ एप्रिलच्या प्रशासकीय बैठकीत प्रशासनाने रद्द केले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर