शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अखेर महापालिका प्रशासनाने नियमबाह्य केलेली करवाढ रद्द करण्याचा घेतला निर्णय   

By धीरज परब | Updated: April 26, 2023 13:23 IST

Mira Bhaindar Municipal Corporation: अंदाजपत्रक मंजूर केल्या नंतर नियमबाह्यपणे मीरा भाईंदरच्या नागरिकांवर पाणी पट्टीत वाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात वाढ करण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने रद्द केला आहे.

- धीरज परब मीरारोड - अंदाजपत्रक मंजूर केल्या नंतर नियमबाह्यपणे मीरा भाईंदरच्या नागरिकांवर पाणी पट्टीत वाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात वाढ करण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने रद्द केला आहे. करवाढ रद्द केल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असून १० टक्के रस्ता कर मात्र कायम राहणार आहे.

महापालिकेत प्रशासन राज असून पालिकेने नागरिकांवर १० टक्के रस्ता कर लावण्याचा तसेच मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ व पालिका सभागृहांच्या भाड्यात वाढ केली होती.

त्या नंतर मार्च मध्ये सादर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात मात्र नागरिकांवर कोणतीही करवाढ केली नव्हती. करवाढ केली नाही म्हणून प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. नंतर मात्र २८ मार्चच्या प्रशासकीय बैठकीत नागरिकांवर नव्याने निवासी वापरा साठी कर योग्य मूल्याच्या १० टक्के व अनिवासी वापरा साठी १५ टक्के इतका पाणी पुरवठा लाभ कर लावला . अग्निशमन सेवा करात अर्धा टक्क्यांनी वाढ करून तो दिड टक्का केला गेला.

पाणी दरात २३ ते ३० टक्के वाढ करत निवासी वापराच्या प्रति हजार लिटर पाण्याचा दर  १३ रुपये वरून १६ रुपये तर वाणिज्य वापराचा दर ५० रुपये वरून ६५ रुपये केला. कहर म्हणजे दरवर्षी पाणीपट्टी  ५ टक्के ने वाढवत नेण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाने घेतला.

सदर करवाढी प्रकरणी महापालिका अधिनियम नुसार नवीन कर आकारणी वा दरवाढ करायची असेल तर २० फेब्रुवारी पर्यंत तसे निर्णय घेतले पाहिजेत. तसेच नवीन कर वा दरवाढ करायची तर ती अंदाजपत्रकातच करणे अपेक्षित असते असे लोकमत ने बातमीत नमूद केले होते.

२०११ साली राज्य शासनाने त्यावेळी महासभेचे झालेले करवाढीचे ठराव हे २० फेब्रुवारी आधी निर्णय न घेतल्याने विखंडीत केले होते. त्यामुळे प्रशासनाच्या २८ मार्च रोजी केलेल्या करवाढीच्या निर्णयांवर विखंडनाची कार्यवाही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. लोकमत ने कायदेशीर बाब मांडल्या नंतर तसेच राजकीय नेते, आजी माजी आमदार, माजी नगरसेवक मात्र करवाढी वर चिडीचूप असल्याची टीका लोकमत मधून उठल्या नंतर राजकारणी हलू लागले.

भाजपा जिल्हाध्यक्ष एड.  रवी व्यास यांनी आयुक्तांना पत्र देऊन नियमांचा हवाला देत करवाढ रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून लेखी निवेदन देत करवाढ रद्द करण्याची संधी केली होती. भाजपा व काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. माजी म्हाडा सभापती व शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर  यांनी करवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

अखेर २८ मार्चच्या प्रधासकीय बैठकीत मंजूर केलेले पाणी पट्टी दरवाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात अर्धा टक्का  वाढ करण्याचे निर्णय मंगळवार २५ एप्रिलच्या प्रशासकीय बैठकीत प्रशासनाने रद्द केले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर