शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

अखेर भार्इंदरमधील बंद पोलीस चौक्यांना मिळाले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 22:28 IST

महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत.

मीरा रोड - महापालिकेमार्फत नगरसेवक निधीतून बांधलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलीस चौक्यांना आता पोलीस मिळू लागले आहेत. चौक्या सुरू झाल्याने गुन्हेगारीला आळा बसेल व सुरक्षिततेची भावना वाढेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.भार्इंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक जवळील बालाजी नगर येथे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. आॅगस्ट २०१४ मध्ये सदर चौकीचे उद्घाटन तत्कालीन महापौर कॅटलीन परेरा, उपअधीक्षक सुहास बावचे आदींच्या हस्ते झाले होते. रेल्वे स्थानकास लागून असलेल्या या परिसरात लूटमार, चोरीपासून अगदी हत्येची देखील घटना घडली होती.काही महिन्यांआधी तर येथील रेल्वेचे तिकीट घर चोरीसाठी फोडण्यात आले होते. रात्री अपरात्री असामाजिक प्रवृत्तींचा असलेला वावर, चेन स्रेचिंग आदींमुळे नागरिकांनी सातत्याने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी चालवली होती. नगरसेवक पाटील देखील त्यासाठी पत्रव्यवहार करत होते.अखेर सदर चौकीसाठी भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बिश्वास यांची बीट अधिकारी म्हणून सदर चौकीत नियुक्ती केली आहे. त्यामुळे नेहमी बंद राहणारी चौकी आता सुरू झाल्याने येथील गुन्हेगारी प्रवृत्ती व घटनांवर आळा बसेल अशी आशा आहे. पण नियमितपणे त्यातही रात्रीच्या वेळेस पोलिसांची उपस्थिती गरजेची मानली जातेय. बालाजीनगरच्या चौकीप्रमाणेच भार्इंदर पूर्व - पश्चिम जोडणा-या उड्डाणपुलाखाली नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांच्या नगरसेवक निधीमधून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. सदर चौकी देखील बांधल्यापासून बंदच होती. पोलीस बळ नसल्याचे कारण नेहमी दिले जात होते.खंडेलवाल यांनी चौकी सुरू करावी म्हणून पाठपुरावा चालवला होता. नुकतीच निरीक्षक कांबळे यांनी चौकीची पाहणी केली. या वेळी रहिवासीसुद्धा उपस्थित होते. चौकीची रंगरंगोटी, आवश्यक सुविधा वगैरे उपलब्ध करून देण्याचे ठरले. सदर चौकी देखील सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन कांबळे यांनी दिल्याचे खंडेलवाल म्हणाले. 

टॅग्स :Policeपोलिस