शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अखेर मीरा-भार्इंदरमधील १०० हून अधिक बार झाले खुले; मद्यपींना झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 16:33 IST

मीरा-भार्इंदर शहरातील  १०० हुन अधिक बार पुन्हा खुले झाल्याने मद्यपींच्या झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

ठळक मुद्दे पश्चिम महामार्ग ८ वरील २५ हून अधिक बार, परमिट रुम व मद्यविक्रीची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली.

भार्इंदर, दि. ९ - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील ५०० मीटर परिघात असलेल्या मद्यविक्रीला बंदी घाल्यानंतर त्याविरोधात दाखल याचिकेवर काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारला बारबंदीवर निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे मीरा-भार्इंदर शहरातील  १०० हुन अधिक बार पुन्हा खुले झाल्याने मद्यपींच्या झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

सुरुवातीला मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून जाणा-या पश्चिम महामार्ग ८ वरील २५ हून अधिक बार, परमिट रुम व मद्यविक्रीची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली. त्यानंतर २००६ पूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्युडी) नोंद असलेला राज्य महामार्ग क्रमांक ८४ पालिकेकडे वर्ग झाल्यानंतरही त्याची पुर्नअधिसूचना जारी न झाल्याने राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने या मार्गावरील काशिमिरा ते पुर्वीचे रेल्वे फाटक दरम्यानचा रस्ता तसेच रेल्वे फाटक ते भार्इंदर पोलिस ठाणे मार्गे उत्तन दरम्यानचे ७८ बार २ मेपासुन बंद केले. 

यावेळी पीडब्ल्युडीच्या भोंगळ कारभारामुळेच बार बंद झाल्याचा आरोप बार मालकांकडून करण्यास सुरुवात झाली. या बंदीमुळे बारवाल्यांची उपासमार टाळण्यासाठी त्यामध्ये एनर्जी ड्रिंक व चाय का प्याला मिळू लागला. हा व्यवसाय खिसाभरु नसल्याने त्यांनी बार पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तत्पुर्वी बार मालकांनी प्रती परमिट रुमसाठी सुमारे ४ लाख रुपये, वाईन शॉप्ससाठी ६ लाख व बिअर शॉप्ससाठी १ लाख २० हजार रुपये असे कोट्यावधींचे शुल्क परवाना नुतनीकरण शुल्कापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आगाऊ जमा केले. 

हे शुल्क आगाऊ वसुल करुनही बार बंद केल्याने मद्यविक्रीत गुंतलेल्यांवर बेकारीचे संकट कोसळल्याची ओरड होऊ लागली. त्यांनी स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्याकडे धाव घेत त्यांना सरकारकडे बाजु मांडण्यासाठी साकडे घालण्यात आले. मेहता यांच्या प्रयत्नाने १३ मे रोजी राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली. त्यात शहरातील बारवाल्यांनी महसुल मंत्र्यांना विनवण्या करुन बारवरील बंदी उठविण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. त्यावर महसुल मंत्र्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन देत मद्यविक्रीला मात्र आपला पाठींबा नसल्याचा सावध पावित्रा घेतला. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील बारबंदीचा निर्णय राज्य सरकारकडून ठरविला जाण्यावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर पालिका हद्दीतील राज्य महामार्गावरील ७८ बारसह राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २५ बार नुकतेच सुरु करण्यात आल्याने मद्यपींच्या झिंगाट पार्टीसाठी पर्याय मोकळा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय