शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राज्य राखीव पोलीस दलाच्या जिल्हा बदली निर्णयामुळे ठाण्यातील समाजसेविकेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 01:22 IST

राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.

ठळक मुद्देनिर्णयाचे स्वागत एसआरपीएफ जवानांनीही साजरा केला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत बुधवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी पाच वर्षांवरुन दोन वर्षांवर करण्याचा निर्णय देखिल घेण्यात आला.ठाण्याच्या दिवा भागात राहणाºया समाजसेविका अश्विनी यांनी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन केले होते. कोरोनामुळे आंदोलनाला मुंब्रा पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांनी घरातच उपोषण केले होते. या आंदोलनाची त्यांनी मार्च २०१९ पासून सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी मुंडन आंदोलनही केले होते. त्या किडनी विकाराने ग्रस्त असून मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, ‘लोकमत’नेही त्यांच्या या आंदोलनाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत वृत्त प्रसिद्ध करुन त्यांची मागणी लावून धरली होती. बुधवारी राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतल्यामुळे अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.* आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश आल्यामुळे केंद्रे कुटुंबीयांनी पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखीव दलातील जवानांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री, पर्यावरण मंत्री आणि पोलीस महासंचालक यांचे आभार मानले आहे.

* ‘लोकमत’चे विशेष आभारराज्य राखीव दलाच्या जवानांच्या बदलीच्या संदर्भात आंदोलन करुन आम्ही लढा दिला. परंतू, या लढयाबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने याचे वार्तांकन करुन या लढयात आमच्यासह एसआरपीएफच्या जवांनांना मोठी ताकद दिली. त्यामुळे ‘लोकमत’चेही विशेष आभार मानत असल्याचे अश्विनी केंद्रे यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र