शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

अखेर राज्य राखीव पोलीस दलाच्या जिल्हा बदली निर्णयामुळे ठाण्यातील समाजसेविकेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 01:22 IST

राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.

ठळक मुद्देनिर्णयाचे स्वागत एसआरपीएफ जवानांनीही साजरा केला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत बुधवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी पाच वर्षांवरुन दोन वर्षांवर करण्याचा निर्णय देखिल घेण्यात आला.ठाण्याच्या दिवा भागात राहणाºया समाजसेविका अश्विनी यांनी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन केले होते. कोरोनामुळे आंदोलनाला मुंब्रा पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांनी घरातच उपोषण केले होते. या आंदोलनाची त्यांनी मार्च २०१९ पासून सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी मुंडन आंदोलनही केले होते. त्या किडनी विकाराने ग्रस्त असून मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, ‘लोकमत’नेही त्यांच्या या आंदोलनाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत वृत्त प्रसिद्ध करुन त्यांची मागणी लावून धरली होती. बुधवारी राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतल्यामुळे अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.* आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश आल्यामुळे केंद्रे कुटुंबीयांनी पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखीव दलातील जवानांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री, पर्यावरण मंत्री आणि पोलीस महासंचालक यांचे आभार मानले आहे.

* ‘लोकमत’चे विशेष आभारराज्य राखीव दलाच्या जवानांच्या बदलीच्या संदर्भात आंदोलन करुन आम्ही लढा दिला. परंतू, या लढयाबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने याचे वार्तांकन करुन या लढयात आमच्यासह एसआरपीएफच्या जवांनांना मोठी ताकद दिली. त्यामुळे ‘लोकमत’चेही विशेष आभार मानत असल्याचे अश्विनी केंद्रे यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र