शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राज्य राखीव पोलीस दलाच्या जिल्हा बदली निर्णयामुळे ठाण्यातील समाजसेविकेचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 01:22 IST

राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.

ठळक मुद्देनिर्णयाचे स्वागत एसआरपीएफ जवानांनीही साजरा केला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव पोलीस जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट आता १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. याच मागणीसाठी गेली अनेक दिवस लढा देणाऱ्या ठाण्यातील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनीही गुरुवारी या जवानांसोबत आनंद साजरा केला.राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत बुधवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी पाच वर्षांवरुन दोन वर्षांवर करण्याचा निर्णय देखिल घेण्यात आला.ठाण्याच्या दिवा भागात राहणाºया समाजसेविका अश्विनी यांनी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन केले होते. कोरोनामुळे आंदोलनाला मुंब्रा पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांनी घरातच उपोषण केले होते. या आंदोलनाची त्यांनी मार्च २०१९ पासून सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी मुंडन आंदोलनही केले होते. त्या किडनी विकाराने ग्रस्त असून मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, ‘लोकमत’नेही त्यांच्या या आंदोलनाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत वृत्त प्रसिद्ध करुन त्यांची मागणी लावून धरली होती. बुधवारी राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतल्यामुळे अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे.* आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश आल्यामुळे केंद्रे कुटुंबीयांनी पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखीव दलातील जवानांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री, पर्यावरण मंत्री आणि पोलीस महासंचालक यांचे आभार मानले आहे.

* ‘लोकमत’चे विशेष आभारराज्य राखीव दलाच्या जवानांच्या बदलीच्या संदर्भात आंदोलन करुन आम्ही लढा दिला. परंतू, या लढयाबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने याचे वार्तांकन करुन या लढयात आमच्यासह एसआरपीएफच्या जवांनांना मोठी ताकद दिली. त्यामुळे ‘लोकमत’चेही विशेष आभार मानत असल्याचे अश्विनी केंद्रे यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र