शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अखेर आयुक्तांच्या बदलीनंतर सत्ताधाऱ्यांनी बंद केलेली दालने केली खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 23:59 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या असहकाराविरोधात १९ जानेवारीपासून आपापली दालने कुलूपबंद केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांची बदली केल्यानंतर अखेर ती बंद दालने सत्ताधा-यांनी सोमवारी खुली केली.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या असहकाराविरोधात १९ जानेवारीपासून आपापली दालने कुलूपबंद केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांची बदली केल्यानंतर अखेर ती बंद दालने सत्ताधा-यांनी सोमवारी खुली केली.तत्कालीन आयुक्त सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील व सहा प्रभाग सभापतींनी स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांच्या निर्देशानुसार १९ जानेवारीपासून आपापल्या दालनांना सील ठोकून ती परस्पर बंद केली. यामुळे नागरिकांचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांशी थेट संपर्क तुटला होता. कुलूपबंद दालनातील कर्मचारी देखील यामुळे कामाविना ठरले होते. भाजपाच्या या दबावतंत्राविरोधात शिवसेनेसह काँग्रेसने आंदोलन छेडून परस्पर पालिकेच्या वास्तूंतील दालने बंद केल्याने सत्ताधाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.परंतु प्रशासनाने सत्ताधा-यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखविता सेना-काँग्रेस या विरोधी पक्षांनी विरोधी पक्षनेत्यांचे दालन परस्पर खुले केले होते, ते मात्र त्वरित सील करण्याचे धाडस केले. सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या असहकाराचा पाढा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कार्यवाहीचे संकेत दिल्यानंतर आयुक्तांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत मिळाले होते. अखेर राज्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी ५ फेब्रुवारीला चर्चा करून आयुक्तांच्या बदलीचा आदेश काढला. यात सत्ताधारी भाजपाचा प्रामुख्याने आ. नरेंद्र मेहता यांचा विजय झाल्याने त्यांच्या निर्देशानुसार बंद झालेली दालने खुली होण्याची चिन्हे निर्माण झाली. परंतु सत्ताधाऱ्यांनी नवीन आयुक्तांच्या पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा करून दालने बंदच ठेवणे पसंत केले.अखेर नव्याने आयुक्तपदावर नियुक्ती झालेल्या बी. जी. पवार यांनी ९ फेब्रुवारीला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत सत्ताधाऱ्यांची बैठक पार पाडण्यात आली. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आपल्या कामांना प्राधान्य देण्याची अट आयुक्तांना घातली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी प्रशासन, सत्ताधा-यांसोबत सामंजस्याने कारभार करेल, असा आशावाद सत्ताधा-यांसाठी निर्माण केला. यावर समाधान झालेल्या सत्ताधाऱ्यांनी अखेर सोमवारी दालने खुली करण्याचा मुहूर्त निश्चित केला. त्यानुसार सत्ताधाऱ्यांतील पदसिद्ध अधिकाऱ्यांनी गेल्या २४ दिवसांपासून बंद असलेली आपापली दालने सोमवारी पुन्हा खुली करुन आपापला कारभार सुरू केला. यावेळी आ. मेहता यांनी देखील महापौर दालनात नेहमीप्रमाणे हजेरी लावल्याने नागरीकांनी त्या-त्या दालनात गर्दी केली होती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक