शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अखेर एसीपी निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, मुख्यालय प्रमुखांनी काढली हजर होण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 23:01 IST

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत.

- जितेंद्र कालेकरठाणे, दि. 13 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत. हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुभद्रा या कॉन्स्टेबलने कळवा येथील तिच्या घरी ६ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्याच दिवसापासून निपुंगे हे देखील ठाणे शहर नियंत्रण कक्षाला कळवून सिक (वैद्यकीय) रजेवर निघून गेले. परंतु, त्यांनी मुख्यालय-२ चे उपायुक्त संदीप पालवे किंवा मुख्यालय-१ च्या उपायुक्त डॉ. प्रिया नारनवरे यांच्यापैकी कोणालाही याबाबतची माहिती दिली नाही. शिवाय, कळवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांनी वैद्यकीय रजा घेतली असली, तरी त्याबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे दिलेली नाहीत. गेले सात दिवस त्यांची वाट पाहिल्यानंतर मुख्यालय-२ चे उपायुक्त पालवे यांनी त्यांना बुधवारी पुणे येथील निवासस्थानी नोटीस बजावली आहे.

काय म्हटले आहे नोटीसमध्ये...‘आपण सिक रिपोर्ट केला आहे. मात्र, मेडिकल रिपोर्ट दिले नाहीत. एकतर, मेडिकल रिपोर्ट सादर करा किंवा स्वत: कर्तव्यावर हजर व्हा. या दोन्हींपैकी काहीच केले नाहीतर तुमच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.काय होऊ शकते कारवाई...विनाकारण गैरहजर राहिल्यास वैद्यकीय कारणातही तथ्य आढळले, नाहीतर निपुंगे यांना सक्त ताकीद, सक्तीची रजा किंवा थेट निलंबनापर्यंतही कारवाई होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्यापुढे किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी संदीप पालवे यांच्यापैकी कुठेतरी निपुंगे यांना हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. कळवा पोलीस ठाण्याच्या कलम ३०६ च्या प्रकरणात जर तथ्य आढळले, तर त्यांच्यावर अटकेचीही कारवाई होऊ शकते, असेही या अधिकाºयाने सांगितले. 

 

टॅग्स :Policeपोलिस