शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

केडीएमसीवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:23 IST

कल्याण पूर्व येथील जरीमरीनगर आणि लक्ष्मीबाग येथे ज्या सोसायट्यांमधील नागरिक कचरा वर्गीकरण करतात, त्यांच्या घरापासून थेट डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचऱ्याचा होणारा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला असता

प्रशांत माने कल्याण : कल्याण पूर्व येथील जरीमरीनगर आणि लक्ष्मीबाग येथे ज्या सोसायट्यांमधील नागरिक कचरा वर्गीकरण करतात, त्यांच्या घरापासून थेट डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचऱ्याचा होणारा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला असता लोकांनी वर्गीकरण करून दिलेला कचरा घंटागाडीमध्ये एकत्र केला जातो व डम्पिंग ग्राउंडवर एकत्र टाकला जातो, हे धक्कादायक वास्तव नजरेस पडले. आता केडीएमसी प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे का, असा सवाल कचरा वर्गीकरण करणारे नागरिक विचारत आहेत.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जरीमरीनगर व लक्ष्मीबाग या प्रभागातील ज्या सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण केले जाते, त्या सोसायटीला भेट दिली. येथील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा जमा करण्याकरिता दोन स्वतंत्र कचरापेट्या ठेवलेल्या आहेत. येथील रहिवासी कचरा वर्गीकरण करतात. मात्र, त्यांच्याकडे येणारा सफाई कर्मचारी हा कचरा घेऊन गेल्यावर घंटागाडीत तो एकत्र केला जातो. ही घंटागाडी तेथून डम्पिंग ग्राउंडवर गेली की, तेथे कचरा वाहून नेणाºया गाड्यांची रांग लागली होती. एकत्र केलेला कचरा ओतला जात होता. याबद्दल घंटागाडीचालकाला व डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाºयांना विचारले असता, त्यांनी कचरा वेगवेगळा टाकण्याबाबत ना घंटागाडीत स्वतंत्र व्यवस्था आहे, ना डम्पिंग ग्राउंडवर तशी व्यवस्था आहे, असे सांगत कानांवर हात ठेवले.ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याबाबतची मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, पण कचरा उचलण्यासाठी येणाºया घंटागाडीमध्ये मात्र वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे वर्गीकरण करून काय उपयोग, असा सवाल जरीमरीनगरमधील गृहिणी राधिका शिवणकर यांनी केला आहे.सविता कुंभार्डे, कुं दा साळुंखे, गीताबाई सरगड आणि सुमिता चिकणे या महिलांनीही महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. घंटागाडी वेळेवर येत नाही, काही वेळेस येतच नाही. त्यामुळे ओला कचरा घरातच पडून राहतो. आमच्या सोसायटीमध्ये ओल्या कचºयापासून खत करण्याकरिता पुरेशी जागा नाही. शिवाय, सोसायटीची खताची गरज भागल्यावर अतिरिक्त खतनिर्मिती करून काय करायचे, अशी कैफियत त्यांनी मांडली.सुका कचरा घेऊन जाण्याकरिता आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा व ओला कचरा दररोज घेऊन जाणे गरजेचे आहे, अशीही मागणी त्यांनी केली. महापालिकेची कचरा गोळा करण्याची सध्याची व्यवस्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी असल्याची टीका या महिलांनी केली.लक्ष्मीबाग प्रभागातील महिला एलिझाबेथ मॅथ्यू यांनीही ओल्या आणि सुक्या कचºयाची स्वतंत्रपणे वाहतूक होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे, हे कबूल करतानाच केडीएमसी प्रशासनाने आपल्या कृतीतून कचरा वर्गीकरणाकरिता प्रेरणा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.रहिवाशांची कैफियत ऐकल्यावर कचरा गोळा करण्याकरिता येणाºया घंटागाडीकरिता थांबलो. घंटागाडी येताच कचरा गोळा करणाºयाने पटापट ओला व सुका कचरा एकत्रित घंटागाडीत ओतला. अल्पावधीत घंटागाडी कचºयाने काठोकाठ भरली. कचºयाची वाहतूक करणाºया घंटागाडीवरील कर्मचाºयाक डे विचारणा करता नाव न सांगण्याच्या अटीवर तो म्हणाला की, आमच्याकडे स्वतंत्रपणे सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे एकत्रित कचरा वाहून नेला जातो. गोळा केलेला कचरा मोठ्या गाडीतून एकत्रित डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो. ठिकठिकाणचा कचरा गोळा केल्यावर घंटागाडीतील कचरा मोठ्या कचरा वाहून नेणाºया कॉम्पॅक्टरमध्ये दाबून बसवण्यात आला. त्यानंतर, कॉम्पॅक्टर डम्पिंग ग्राउंडकडे निघाला.ज्याठिकाणी कचरा डम्प केला जातो, त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता कचरागाड्यांची एकामागोमाग एक भलीमोठी रांग लागली होती. गाडीतील कचरा जलदगतीने ओतून पुन्हा कचरा भरण्याकरिता ती लगबगीने जात होती. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाºयांना कचºयाच्या वर्गीकरणाबाबत विचारले असता तो त्रासिकपणे म्हणाला की, कचरा वर्गीकरणाच्या कसल्या गप्पा मारता. इथे कचºयाच्या गाड्या उभ्या करण्याचे वांदे झाले आहे. डम्पिंग ग्राउंडवरील व्यवस्थेबाबत त्याने नाराजी व्यक्त केली.