शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

केडीएमसीवरच गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:16 AM

१ मे पासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे.

डोंबिवली/कल्याण : ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास महाराष्ट्र दिनापासून कचरा न उचलण्याची दमदाटी करणाºया, फौजदारी गुन्ह्याची भीती घालणाºया कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावरच कचरा विल्हेवाट व व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता लोकांना धमक्या कसल्या देता आणि आपल्या अपयशाचे खापर लोकांच्या ‘बोडक्या’वर कशाला मारता, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. १ मे पासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेवर डोंबिवलीकरांनी तीव्र व तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.घनकचरा व्यवस्थापनाची नियमावली पालिका प्रशासनाने २००२ सालापासून अवलंबली नाही. प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने प्रशासनाचे अनेकदा कान उपटले. तसेच घनकचºयाची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील महापालिकेकडून प्रकल्प उभारण्याचे काम सुरूच आहे. कागदी घोडे नाचवले जात आहेत. लोकांवर नव्हे तर महापालिकेने प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केली म्हणून महापालिकेविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याकरिता वार्षिक १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली महापालिका नागरिकांना डस्टबिन देऊ शकत नाही का? त्यामुळे कचरा उचलला नाही तर नागरिकांनी ओला, सुका कचरा गोळा करून तो आयुक्तांच्या दालनातच टाकावा. तेव्हाच त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील.- सुहास तेलंग, नामांकित वकीलशहरातील रस्ते अरुंद आहेत. शहरात अतिक्रमणे आहेत. मोठ्या बसगाड्यांना रस्त्यावर वळण्यास जागा नाही. वाहतूककोंडी होत आहे. इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. आधीच नागरी सुविधांकरिता पुरेशी जागा नाही. अशा परिस्थितीत सोसायट्यांनी ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्याकरिता जागा कुठून आणायची. खतनिर्मितीकरिता जागा तरी महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. मगच असे उफराटे फतवे काढावे. कचरा वर्गीकरणास विरोध असण्याचे कारण नाही. कचरा वर्गीकरण करण्याच्या धमक्या दिल्याने ते केले जात नाही. कचºयापासून खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण लोकांना प्रशासनाने दिले का? सक्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर तो होणार नाही. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. हौसेने कुणी बागेत कचºयापासून खत तयार करत असेल. मात्र, सक्तीने ते करण्यास भाग पाडू नका.- प्रा.डॉ. उदयकुमार पाध्येकचरा वर्गीकरण करणे, ही कल्पना वाईट नाही. मात्र, हा निर्णय नागरिकांवर लादून चालणार नाही. त्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी नागरिकांना सवय लावणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सक्ती करता येईल. काल जाहीर केले आणि आज झाले, असे होत नाही. ही एक प्रक्रिया आहे. पण हेच महापालिका प्रशासनाच्या डोक्यात उतरलेले नाही. कारण त्यांच्या डोक्यात केवळ कचरा आहे. १ तारखेपासून कचरा उचलणार नाही, असे जाहीर करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना देणाºया नोटिसा पाठवल्या आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. चार दिवसांत दोन लाख मालमत्ता, ९० हजार आस्थापनांना नोटिसा कशा पाठवणार. त्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.- निलेश भणगे, प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअरसोसायटीचे प्रमुख

टॅग्स :thaneठाणे