शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भिवंडीत शांतताक्षेत्र केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 4:04 AM

पोलीस, पालिकेचे दुर्लक्ष : कर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास

भिवंडी : पर्यावरण विभागाने पालिका क्षेत्रात १६ शांतता क्षेत्रांची घोषणा केवळ कागदावर जाहीर केली असून त्या ठिकाणी पालिकेने शांतातक्षेत्र दर्शविणारे फलकही लावलेले नाहीत. तसेच या क्षेत्रात पोलीस किंवा पालिका कर्मचाऱ्यांकडून शांतता भंग करणाºयांवर कारवाईही झालेली नाही.

नागरी वस्तीत कर्कश हॉर्न वाजविले जात असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेने १६ शांतता क्षेत्राची यादी जाहीर केली. त्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय, इंदिरा गांधी स्मृती रूग्णालय,चाविंद्रा रोड पालिका शाळा, ममता रूग्णालय, एसएनडीटी कॉलेज कल्याणरोड, महापालिका शाळा क्र. ४६ पोलीस लाईन, सरकारी तंत्रनिकेतन(आयटीआय),पद्मश्री आण्णासाहेब जाधव शाळा, शेट जुगीलाल पोद्दार शाळा, बी.एन.एन.कॉलेज, पी.टी.हायस्कूल, ओसवाल शाळा,कान्हा चौधरी शाळा,जयराम सखाराम टावरे शाळा, गुरूकृपा रूग्णालय, पीली शाळा (निजामपूर) यांचा समावेश आहे. त्यापैकी काही शांतता क्षेत्र हे शांततेच्या ठिकाणीच आहेत. उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे दिली होती. परंतु प्रशासनाकडून त्याचे पालन न झाल्याने शांतता क्षेत्र जाहीर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वत:कडे घेतली. शहरात वंजारपाटी नाका ते कल्याणरोड या मार्गावर न्यायालयासह, रूग्णालय व सरकारी कार्यालये आहेत. असे असताना या मार्गावर नेहमी मोर्चे-आंदोलने होऊन घोषणा दिल्या जातात. तसेच या मार्गावर होणाºया वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हॉर्न वाजवून शांतता भंग करतात.मात्र आजतागायत कुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्याचप्रमाणे शहरात अनेक राजकीय पक्षांना बाईकरॅली काढण्यास परवानगी दिली जाते. त्या बाईकरॅली पोलीस ठाण्यासमोरून कर्कश हॉर्न वाजवत जातात. त्यांना पोलीस आवर घालत नाही.वाचनालय परिसरात गोंगाटच्शांतता क्षेत्र जाहीर करताना टिळक वाचन मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.च्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका आहेत. सर्वच वाचनालयाच्या परिसराचा शांतता क्षेत्रात समावेश करा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी