शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

उल्हासनगरमध्ये खतप्रक्रिया संथगतीने; दीड वर्षात २५ टक्केही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:00 IST

उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने तेथे असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे.

उल्हासनगर : महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रिया गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. मात्र, प्रक्रियेचे काम संथगतीने होत असल्याने २५ टक्केही काम झालेले नाही.उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने तेथे असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. डम्पिंगसाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने नाइलाजास्तव कॅम्प नं ५ येथील खडीखदाण येथील मोकळ्या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात केली. नागरिक व परिसरातील नगरसेवकांनी या डम्पिंगला विरोध करून उपोषण, धरणे आंदोलन, महासभेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन झाले. मात्र, डम्पिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने, शहरातील कचरा खडीखदाण येथे टाकण्यात येतो. डम्पिंगचा भविष्यातील धोका ओळखून तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांनी राज्य सरकारला समस्यांची माहिती देऊन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. अखेर, सरकारने उसाटणे गावाच्या हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरित केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी याठिकाणी एक ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याची योजना राज्य सरकारच्या मदतीने महापालिकेने दीड वर्षांपासून सुरू केली. मात्र, २५ टक्केही काम पूर्ण झालेले नाही. इतर योजनेप्रमाणे याचा फज्जा उडणार असल्याचेही बोलले जात आहे. महापालिकेच्या सार्वजनिक विभागाचे आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य आरोग्य अधिकारी एकनाथ पवार यांनी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू असून २५ टक्क्यांपेक्षा जास्त काम झाल्याची प्रतिक्रिया दिली.किती काम झाले, याची कल्पना नाहीउपमहापौर भगवान भालेराव हे राणा डम्पिंग ग्राउंड असलेल्या परिसरातून नगरसेवकपदी निवडून आले आहेत. या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दीड वर्षांत किती टक्के काम झाले, याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न