शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !

By सुरेश लोखंडे | Updated: March 5, 2024 16:18 IST

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे.

ठाणे : दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवण्याची भीती आहे. यास विचारात घेता ठाणे जिल्ह्यातील जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी या वर्षातील खरीप पिक पेरणी, रब्बी पिक पेरणी, जंगल वनक्षेत्र, चराऊ क्षेत्र, झाडपाला, बांधावरील गवत आदी जनावरांच्या चाऱ्याची अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास फाैजदारी कारवाईचे संकेत आहेत.             

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनाला जूनपर्यंत एक लाख १९ हजार मे. टन चाऱ्याची गरज आहे. पाऊस उशिरा आल्यास जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्पादन होणाऱ्या गवतासह अन्य चारा तसेच मुरघास इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्या बाहेरील खरेदीदारांना, निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, असे आदेश जारी झाले आहे. संभाव्य आपत्ती कालावधीत जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसdroughtदुष्काळ