शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !

By सुरेश लोखंडे | Updated: March 5, 2024 16:18 IST

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे.

ठाणे : दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवण्याची भीती आहे. यास विचारात घेता ठाणे जिल्ह्यातील जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी या वर्षातील खरीप पिक पेरणी, रब्बी पिक पेरणी, जंगल वनक्षेत्र, चराऊ क्षेत्र, झाडपाला, बांधावरील गवत आदी जनावरांच्या चाऱ्याची अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास फाैजदारी कारवाईचे संकेत आहेत.             

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनाला जूनपर्यंत एक लाख १९ हजार मे. टन चाऱ्याची गरज आहे. पाऊस उशिरा आल्यास जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्पादन होणाऱ्या गवतासह अन्य चारा तसेच मुरघास इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्या बाहेरील खरेदीदारांना, निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, असे आदेश जारी झाले आहे. संभाव्य आपत्ती कालावधीत जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसdroughtदुष्काळ