शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:17 IST

Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

- अजित मांडकेठाणे :  कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी वजन वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, ठाण्यात याउलट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी ठाण्यातील सुमारे ३५० हून अधिक कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वजन कसे वाढवायचे याबाबतचे उपायही त्यांनी सांगण्यात येत असून, त्याचा फायदाही झाल्याचे अनेकांनी सांगितले.शहरात ५८ हजार ८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत ५६५८७ रुग्णांनी त्यावर मात केली आहे, तर एक हजार ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामध्येही तीव्र लक्षणे, मध्यम व सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.  ७५ किलोवरून वजन ६५ किलो मला कोरोनाची लागण झाली त्यावेळेस माझे वजन साधारणपणो ७५ किलोच्या आसपास होते; परंतु मला उपचारासाठी रुग्णालयात १५ दिवस राहावे लागले. या काळात माझी प्रकृती सुधारली, मात्र वजन तब्बल १० किलो कमी झाले. त्यामुळे मला जास्तीचे टेन्शन आले होते. त्यामुळे आता पुन्हा वजन वाढविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर काम करीत आहे, असे अजित खेडेकर यांनी सांगितले.ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत किंवा ज्यांना कोरोनामुळे १० दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात राहावे लागले आहे, अशांच्या वजनात कमालीची घट झाली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांचे वजन ५ ते १० किलोने कमी झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे काही रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. झपाट्याने वजन कमी हाेत असल्याने काहींना नैराश्यानेही गाठले हाेते. त्यातच अशक्तपणाही कमालीचा वाढला हाेता. त्यामुळे अनेकांना काय करावे हेच सुचत नव्हते. काहींनी वैद्यकीय सल्ला घेतला तर काहींनी घरगुती उपाय करून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला.  व्यायामाशिवाय फक्त आरामज्यांचे कोरोनानंतर वजन कमी झाले असेल त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियमित व्यायाम करून पुरेशी झोप घ्यावी. शिवाय यासाठी पोषक आणि पूरक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वजन वाढण्यास निश्चित मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या रुग्णांनी महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन यामागची कारणे मागितली आहेत. तसेच वजन वाढविण्यासाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहे, याचीही माहिती घेतली आहे. वजन कमी झालेल्यांच्या ३५० हून अधिक तक्रारी पालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये मिळाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे त्यांचे मत परिवर्तन करणे, त्यांच्यातील भीती दूर करणे, वजन वाढविण्यासाठी उपायांची माहिती दिली जात आहे. ज्यांना रुग्णालयात उपचारासाठी १० ते २० दिवस राहावे लागले, अशा रुग्णांचे निश्चितच वजन कमी झाले आहे. या काळात तोंडाला चव नसणे, खाण्याची इच्छा नसणे आणि मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेही अनेकांचे वजन कमी झालेले आहे; परंतु कोरोनावर मात केल्यानंतर आहार घेतल्यानंतर आणि रोजच्या रोज व्यायाम केल्याने वजन वाढण्यास मदत होत आहे.- डॉ. कैलास पवार,  जिल्हा शल्यचिकित्सक,     ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेHealthआरोग्य