शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:17 IST

Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

- अजित मांडकेठाणे :  कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी वजन वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, ठाण्यात याउलट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी ठाण्यातील सुमारे ३५० हून अधिक कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वजन कसे वाढवायचे याबाबतचे उपायही त्यांनी सांगण्यात येत असून, त्याचा फायदाही झाल्याचे अनेकांनी सांगितले.शहरात ५८ हजार ८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत ५६५८७ रुग्णांनी त्यावर मात केली आहे, तर एक हजार ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामध्येही तीव्र लक्षणे, मध्यम व सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.  ७५ किलोवरून वजन ६५ किलो मला कोरोनाची लागण झाली त्यावेळेस माझे वजन साधारणपणो ७५ किलोच्या आसपास होते; परंतु मला उपचारासाठी रुग्णालयात १५ दिवस राहावे लागले. या काळात माझी प्रकृती सुधारली, मात्र वजन तब्बल १० किलो कमी झाले. त्यामुळे मला जास्तीचे टेन्शन आले होते. त्यामुळे आता पुन्हा वजन वाढविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर काम करीत आहे, असे अजित खेडेकर यांनी सांगितले.ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत किंवा ज्यांना कोरोनामुळे १० दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात राहावे लागले आहे, अशांच्या वजनात कमालीची घट झाली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांचे वजन ५ ते १० किलोने कमी झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे काही रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. झपाट्याने वजन कमी हाेत असल्याने काहींना नैराश्यानेही गाठले हाेते. त्यातच अशक्तपणाही कमालीचा वाढला हाेता. त्यामुळे अनेकांना काय करावे हेच सुचत नव्हते. काहींनी वैद्यकीय सल्ला घेतला तर काहींनी घरगुती उपाय करून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला.  व्यायामाशिवाय फक्त आरामज्यांचे कोरोनानंतर वजन कमी झाले असेल त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियमित व्यायाम करून पुरेशी झोप घ्यावी. शिवाय यासाठी पोषक आणि पूरक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वजन वाढण्यास निश्चित मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या रुग्णांनी महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन यामागची कारणे मागितली आहेत. तसेच वजन वाढविण्यासाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहे, याचीही माहिती घेतली आहे. वजन कमी झालेल्यांच्या ३५० हून अधिक तक्रारी पालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये मिळाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे त्यांचे मत परिवर्तन करणे, त्यांच्यातील भीती दूर करणे, वजन वाढविण्यासाठी उपायांची माहिती दिली जात आहे. ज्यांना रुग्णालयात उपचारासाठी १० ते २० दिवस राहावे लागले, अशा रुग्णांचे निश्चितच वजन कमी झाले आहे. या काळात तोंडाला चव नसणे, खाण्याची इच्छा नसणे आणि मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेही अनेकांचे वजन कमी झालेले आहे; परंतु कोरोनावर मात केल्यानंतर आहार घेतल्यानंतर आणि रोजच्या रोज व्यायाम केल्याने वजन वाढण्यास मदत होत आहे.- डॉ. कैलास पवार,  जिल्हा शल्यचिकित्सक,     ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेHealthआरोग्य