शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 02:28 IST

सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.

ठाणे : जगभरात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे इटलीहून भारतात येणे माझ्या मुलीसाठी कठीण दिसत होते. परंतु, भारत सरकारने माझ्या मुलीला भारतात परतण्यासाठी जी मदत केली, त्याबद्दल मी ऋणी राहील. ती भारतात सुखरूप आली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला. सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.पाचपाखाडी येथे राहणारी संजना कदम ही इटली येथे ४ फेब्रुवारी २०२० ला उच्च शिक्षणासाठी गेली. तेथे गेल्यानंतर तिचे २० फेब्रुवारी रोजी महाविद्यालय सुरू होणार होते. इटलीची राजधानी मिलान येथे ती वास्तव्यास होती. जिथे भाडेतत्त्वावर रूम घेतली, त्यांनीही चार महिन्यांचा करारनामादेखील केला. परंतु, कोरोनाचे संकट यायला सुरुवात झाल्यावर दर सात दिवसांनी सांगायचे की, महाविद्यालय काही दिवसांनी सुरू होईल. यादरम्यान महाविद्यालयाने आॅनलाइन अभ्यास सुरू केला. १० मार्च रोजी तेथील सुपर मार्केटही बंद करण्यात आले. संजनाकडे १५ दिवसांचा अन्नसाठा होता. तिने आपले वडील सुजय कदम यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिला तातडीने भारतात निघून येण्यास सांगितले. परंतु, प्रवास करायचा असेल तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली होती. त्यावेळी वडील कदम यांनी भारतीय दूतावासाला पत्र लिहिले व त्यात सांगितले की, ‘माझी मुलगी इटलीमध्ये अडकली असून तिला प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करा,’ आणि संजनाची माहितीही देण्यात आली. १२ मार्च रोजी कदम यांनी त्यांना ई-मेल केला होता. त्यावेळी भारतीय दूतावासाने मिलान दूतावासाशी संपर्क केला आणि मिलान दूतावासाने १३ मार्च रोजी संध्याकाळी संजनाला संपर्क करून दुसऱ्या दिवशी भारतात जाण्यासाठी विमान तयार आहे, असे सांगितले. १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता ती विमानात बसून १५ मार्च रोजी भारतात परतली.विमानातही तिच्यासह इतर प्रवाशांचीही विशेष काळजी घेण्यात आली. नवी दिल्लीत आल्यावर तिला आयटीबीपी रुग्णालयात ठेवण्यात आले. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत.पुढील १२ दिवस तिला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. भारतात कोरोनासंदर्भात जितक्या तत्परतेने कार्यवाही केली जाते, तितकी इटलीमध्ये नाही. भारतीय दूतावासाने स्वजबाबदारीवर तिला भारतात आणले, असे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Familyपरिवारthaneठाणे