शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या

By धीरज परब | Updated: July 9, 2024 18:39 IST

ते वसईचे राहणारे होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानकाच्या आधी विरार वरून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल खाली आत्महत्या करणारे दोघेजण हे वडील आणि मुलगा असल्याचे स्पष्ट झाले असून ते वसईचे राहणारे होते . 

सोमवारी सकाळी ११ . ३० च्या सुमारास चौथ्या क्रमांकाच्या जलद मार्ग रेल्वे रुळावर विरार वरून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकलच्या खाली दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती . एकाच लोकल खाली दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती . लोकलच्या गार्डने घटनेची माहिती भाईंदर रेल्वे स्थानकात दिली . 

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघांच्या डोक्या वरून लोकल गेल्याने डोके छिन्न विच्छिन्न झाले होते . दोघांचे मृतदेह भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी शव विच्छेदन गृहात पाठवण्यात आले . दोघांची ओळख पातळी नसल्याने सोमवारी रात्री दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले . 

रेल्वेच्या सीसीटीव्ही मध्ये दोघेही फलाट वरून एकत्र जाताना दिसून आले आहेत . शिवाय रेल्वे रुळावर डोके ठेऊन झोपताना देखील फुटेज मध्ये आढळून आले आहे .  दरम्यान वसई रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतांची ओळख पटवण्यास सुरवात केली . त्यात पोलिसांना आढळलेल्या आधार कार्ड वरून हरीश मेहता ( ६० ) आणि जय मेहता ( ३२ ) अशी मृतांची ओळख पटली . हरीश व जय हे वडील आणि मुलगा असून ते नालासोपारा - वसई दरम्यानच्या वसंत नगरी भागात राहणारे होते . 

वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले कि , आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . त्याचा तपास सुरु आहे .  हरीश हे  पूर्वी शेअर मार्केट चे काम करायचे तर जय हा एका शीतपेय कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता . हरीश यांच्या पत्नीचे निधन झाले असून जय यांचे वर्षभरा पूर्वी लग्न झालेले आहे . 

मंगळवारी सायंकाळी वडील हरीश आणि मुलगा जय यांचे मृतदेह घेण्यासाठी त्यांचे नातलग हे भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील शवागार मध्ये आले . तेथून दोघांचे मृतदेह त्यांनी ताब्यात घेतले . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर