शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

घर गमावल्याने नशिबी विस्थापितांचे जीणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 00:47 IST

मातृकृपा इमारत दुर्घटना : सहा वर्षे झाली तरी पुनर्वसनाचा पत्ता नाही

मुरलीधर भवार।

कल्याण : ती अंधारी काळरात्र होती. पत्त्यासारखी आमची धोकादायक इमारत कोसळली. त्यात माझ्या आईचा जीव गेला. तेव्हापासून आम्ही विस्थापित झालो. मित्राने दिलेल्या भाड्याच्या खोलीत एकाकी जीवन जगत आहे. गेली सहा वर्षे आमची इमारत पडीक अवस्थेत आहे. तिचा पुनर्विकास झाला नाही. त्यामुळे विस्थापितांचे जीणे जगत आहे, अशी खंत रवींद्र रेड्डीज या तरुणाने व्यक्त केली. जेव्हाजेव्हा ती भग्नावस्थेतील बिल्डिंग पाहतो, तेव्हा तेथे खेळलेले बालपण, फुललेले तरुणपण आठवूनआठवून माझे डोळे डबडबतात, असेही रेड्डीज म्हणाले.

ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारतीत रेड्डीज कुटुंब राहत होते. रवींद्र यांच्या वडिलांचे निधन झालेले होते. आई सुलक्षणा यांची सत्तरी झाली होती. पायाला त्रास होत असल्याने त्यांना अंथरुणावरून पटकन उठून कुठेही जाणे इतकेच काय घरातल्या घरात ऊठबस करणे लवकर शक्य होत नव्हते. त्यांचा लहान मुलगा रवींद्र हा इस्टेट एजंटचे काम करीत होता. त्याचा भाऊ दीपक हा मुंबईला कामाला जात होता. दोन्ही भाऊ कामावरून दमूनभागून आल्यावर आई व त्यांच्या दोघांच्या जेवणाची तयारी करीत असे. त्या रात्री भाऊ कामावरून लवकर घरी आला नव्हता. रवींद्र हा घराच्या बाहेरच इमारतीच्या परिसरात मित्रासोबत बोलत होता. घरात आई अंथरुणावर होती. रात्री सव्वादहाच्या सुमारास त्यांची धोकादायक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि हाहाकार उडाला.१२ रहिवाशांचा मृत्यू, २७ कुटुंबे झाली बेघरमातृकृपा इमारत कोसळल्यानंतर एकच मोठ्ठा आवाज झाला. तसेच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काळ्याकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरले. रवींद्र यांनी त्याच अंधारात, धुळीच्या लोटांत आईला शोधण्याचा प्रयत्न केला. तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. इमारतीत २७ कुटुंबे राहत होती. ती बेघर झाली. त्यापैकीच रेड्डीज यांचे एक कुटुंब होते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका