शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:24 IST

 न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.

ठाणे, दि. 6 - आपल्यावरील बलात्काराचा आरोप खोटा असून त्याच संदर्भातील डीएनए अहवालही निगेटिव्ह आला आहे. तरीही न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.न्यायालय आणि पोलीस यंत्रणेविरोधात ठाणे कारागृहातच या कैद्याने 2 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्याआधी 30 आणि 31 आॅगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचा इशारा त्याने दिला होता. तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता, त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच आरोपाखाली त्याला अटक झाल्यानंतर त्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. मात्र, आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करून त्याने आपल्याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कारागृहातील अधिकाºयांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.ज्या काळात हा प्रकार घडला आहे, त्या वेळी माझे पती त्या शाळेत नव्हे, तर अन्य शाळेला नोकरीला होते, असा दावा या कैद्याची शिक्षिका पत्नी अंजली शुक्ला हिने केला आहे. ‘‘उपोषणाला बसलेले असल्यामुळे तो केवळ पाणी ग्रहण करत आहे. नियमानुसार त्याला नातेवाइकांची मुलाखत आणि न्यायालयाच्या सुनावणीसाठी बाहेर काढण्यास बंदी आहे. त्याच्या उपोषणाची ठाणे न्यायालय आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाही माहिती दिली असून त्याची कारागृहाच्या डॉक्टरांकडून तपासणीही करण्यात येत आहे.’’नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे‘‘लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर संबंधित पीडित मुलीच्या गर्भाची आणि माझ्या पतीची डीएनए चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आहे. त्यामुळे आता यात नार्को किंवा कोणत्याही चाचणीला आम्ही तयार आहोत. गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या माझ्या पतीची तसेच मुलांनाही भेट दिली जात नाही. हे माणुसकीला धरून नाही. परंतु, पतीला न्याय मिळाला नाही, तर मीदेखील उपोषणाला बसेल.’’अंजली शुक्ला (उपोषणकर्त्या कैद्याची पत्नी), नवी मुंबई