शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 06:43 IST

पदपथावर बसवले : मूलभूत सुविधा देण्याचेही सौजन्य नाही, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हुसकावून लावले

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेकडून शेतकरी आठवडाबाजारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी मीनाताई ठाकरे मंडईतून पालिकेने हुसकावून लावत लक्ष्मी पार्क भागात चक्क पदपथावर शेतकऱ्यांना बसवले. पण, शेतकऱ्यांना पदपथावर बसवल्यानंतर महिना झाला, तरी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची व्यवस्थाच पालिकेने केलेली नाही. पालिका आणि लोकप्रतिनिधींमार्फत शेतकऱ्यांच्या चालवलेल्या या छळाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रामदेव पार्क येथील मंडईच्या आरक्षणात पालिकेने मंडईसह दुकाने काढली असून वरच्या दोन मजल्यांवर चक्क सभागृह बांधले आहे. हे सभागृह कंत्राटदारास भाड्याने देण्याआड पालिकेने खालील दुकाने व मंडईतील गाळेही कंत्राटदारास आंदण दिल्याचा तसेच सभागृह भाड्याने देण्यात कंत्राटदार मनमानी लूट करत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. दररविवारी मंडई-सभागृहाच्या आवारात अर्ध्या दिवसासाठी सरकारी योजनेनुसार भरणारा शेतकरी आठवडाबाजारही पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला.शेतकऱ्यांना हुसकावून लावत पदपथावरच बसवण्याचे प्रकार पालिकेने केले. शेतकरी बाजार येथेच ठेवावा, म्हणून परिसरातील रहिवाशांनी पत्रे दिली. भाजप सोडून अन्य पक्षांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी निवेदने दिली. तरीही, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी कंत्राटदारासाठी शेतकरी बाजार कायमचा बंद करायला लावला. ठाकरे मंडईत त्यांचा जम बसला होता.

मात्र, मंडईतील बाजार बंद पाडून शेतकऱ्यांना कनकियाच्या लक्ष्मी पार्कजवळील पदपथावर आठवडाबाजारासाठी जागा देण्यात आली.पण, त्याला महिना झाला तरीही पालिकेने या शेतकºयांना स्वच्छतागृहासह साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करून दिली नाही. शनिवारी सायंकाळी नाशिकहून भाजीपाला घेऊन निघायचे. रविवारी मध्यरात्री वा पहाटे आल्यावर पदपथावर सकाळ होण्याची वाट पाहायची. सकाळी उठल्यावर अंघोळ, प्रातर्विधीसाठी कुठलीही सोय नाही. दुपारपर्यंत रस्त्याशेजारील पदपथावर धूळ व ऊन खात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे असे अमानवीय हाल पालिकेकडून सुरू आहे. पण, येथे हाल सहन करायचे, वर ग्राहकही नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पालिकेच्या अमानवीय छळ आणि अत्याचाराला कंटाळून रविवार बाजारात यायचेच बंद करून टाकले आहे. सध्या केवळ दोनच शेतकरी येथे येत असल्याचे कालच्या रविवारवरून दिसून आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक