शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 06:43 IST

पदपथावर बसवले : मूलभूत सुविधा देण्याचेही सौजन्य नाही, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हुसकावून लावले

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेकडून शेतकरी आठवडाबाजारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी मीनाताई ठाकरे मंडईतून पालिकेने हुसकावून लावत लक्ष्मी पार्क भागात चक्क पदपथावर शेतकऱ्यांना बसवले. पण, शेतकऱ्यांना पदपथावर बसवल्यानंतर महिना झाला, तरी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची व्यवस्थाच पालिकेने केलेली नाही. पालिका आणि लोकप्रतिनिधींमार्फत शेतकऱ्यांच्या चालवलेल्या या छळाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रामदेव पार्क येथील मंडईच्या आरक्षणात पालिकेने मंडईसह दुकाने काढली असून वरच्या दोन मजल्यांवर चक्क सभागृह बांधले आहे. हे सभागृह कंत्राटदारास भाड्याने देण्याआड पालिकेने खालील दुकाने व मंडईतील गाळेही कंत्राटदारास आंदण दिल्याचा तसेच सभागृह भाड्याने देण्यात कंत्राटदार मनमानी लूट करत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. दररविवारी मंडई-सभागृहाच्या आवारात अर्ध्या दिवसासाठी सरकारी योजनेनुसार भरणारा शेतकरी आठवडाबाजारही पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला.शेतकऱ्यांना हुसकावून लावत पदपथावरच बसवण्याचे प्रकार पालिकेने केले. शेतकरी बाजार येथेच ठेवावा, म्हणून परिसरातील रहिवाशांनी पत्रे दिली. भाजप सोडून अन्य पक्षांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी निवेदने दिली. तरीही, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी कंत्राटदारासाठी शेतकरी बाजार कायमचा बंद करायला लावला. ठाकरे मंडईत त्यांचा जम बसला होता.

मात्र, मंडईतील बाजार बंद पाडून शेतकऱ्यांना कनकियाच्या लक्ष्मी पार्कजवळील पदपथावर आठवडाबाजारासाठी जागा देण्यात आली.पण, त्याला महिना झाला तरीही पालिकेने या शेतकºयांना स्वच्छतागृहासह साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करून दिली नाही. शनिवारी सायंकाळी नाशिकहून भाजीपाला घेऊन निघायचे. रविवारी मध्यरात्री वा पहाटे आल्यावर पदपथावर सकाळ होण्याची वाट पाहायची. सकाळी उठल्यावर अंघोळ, प्रातर्विधीसाठी कुठलीही सोय नाही. दुपारपर्यंत रस्त्याशेजारील पदपथावर धूळ व ऊन खात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे असे अमानवीय हाल पालिकेकडून सुरू आहे. पण, येथे हाल सहन करायचे, वर ग्राहकही नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पालिकेच्या अमानवीय छळ आणि अत्याचाराला कंटाळून रविवार बाजारात यायचेच बंद करून टाकले आहे. सध्या केवळ दोनच शेतकरी येथे येत असल्याचे कालच्या रविवारवरून दिसून आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक