शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

किसान सभेच्या लाँग मार्चला तिसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 18:31 IST

शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले.

कसारा (शहापूर) : शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले. तिसऱ्या दिवशी परिसरातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. नाशिक येथून निघालेल्या लाँग मार्चचे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. गावोगावचे शेतकरी लाँग मार्च मधील शेतकऱ्यांना पाणी पुरवून व फुले देऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.

लाँग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. मंगळवारी रात्री रायगड नगर येथील वालदेवी नदी जवळ श्तकऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. सोबत आणलेल्या भाकरी शेतकऱ्यांनी येथे आपसात वाटून खाल्ल्या. किमान 30 हजार शेतकऱ्यांना रोडवर व आजूबाजूच्या शेतात झोपून मुक्कामाची पहिली रात्र काढली. सकाळी पुन्हा 18 किलोमीटर अंतर पायी चालून लाँग मार्च खंबाळे ता. इगतपुरी येथे पोहचला. येथील तळ्यावर आपल्या बरोबर आणलेला तांदूळ उकडून शेतकऱ्यांनी भोजन केले. बुधवारी रात्री घाटनदेवी ता. इगतपुरी येथे मुक्काम केला. वाडा, शहापूर, ठाणे, पालघर, विक्रमगड येथील हजारो शेतकरी 8 मार्चला आटगाव ता. शहापूर येथे लाँग मार्चमध्ये सामील झाले.  लाँग मार्चच्या पुढे पारंपरिक वाद्ये वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. घोषणांनी वातावरण दुमदुमून निघत आहे.  किसान सभेचे डॉ अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा  कलशेट्टी, बारक्या मांगात, रडका कलांगडा आदी नियोजन व नेतृत्व करत आहेत. महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

प्रत्यक्ष सामील होऊ न शकलेल्या शेतकऱयांनी लॉंग मार्चच्या समर्थनार्थ आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने करून, निवेदने देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.