शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

किसान सभेच्या लाँग मार्चला तिसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 18:31 IST

शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले.

कसारा (शहापूर) : शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले. तिसऱ्या दिवशी परिसरातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. नाशिक येथून निघालेल्या लाँग मार्चचे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. गावोगावचे शेतकरी लाँग मार्च मधील शेतकऱ्यांना पाणी पुरवून व फुले देऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.

लाँग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. मंगळवारी रात्री रायगड नगर येथील वालदेवी नदी जवळ श्तकऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. सोबत आणलेल्या भाकरी शेतकऱ्यांनी येथे आपसात वाटून खाल्ल्या. किमान 30 हजार शेतकऱ्यांना रोडवर व आजूबाजूच्या शेतात झोपून मुक्कामाची पहिली रात्र काढली. सकाळी पुन्हा 18 किलोमीटर अंतर पायी चालून लाँग मार्च खंबाळे ता. इगतपुरी येथे पोहचला. येथील तळ्यावर आपल्या बरोबर आणलेला तांदूळ उकडून शेतकऱ्यांनी भोजन केले. बुधवारी रात्री घाटनदेवी ता. इगतपुरी येथे मुक्काम केला. वाडा, शहापूर, ठाणे, पालघर, विक्रमगड येथील हजारो शेतकरी 8 मार्चला आटगाव ता. शहापूर येथे लाँग मार्चमध्ये सामील झाले.  लाँग मार्चच्या पुढे पारंपरिक वाद्ये वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. घोषणांनी वातावरण दुमदुमून निघत आहे.  किसान सभेचे डॉ अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा  कलशेट्टी, बारक्या मांगात, रडका कलांगडा आदी नियोजन व नेतृत्व करत आहेत. महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.

प्रत्यक्ष सामील होऊ न शकलेल्या शेतकऱयांनी लॉंग मार्चच्या समर्थनार्थ आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने करून, निवेदने देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.