शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

धान्य न घेतल्याने शेतकरी व्यथित, भात पेटवण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 1:07 AM

भात पेटवण्याचा इशारा : खरेदी-विक्री संघाचे मार्केटिंग फेडरेशनला साकडे

मुरबाड : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला असल्याने मिळालेल्या तुटपुंज्या पिकाची बाजारात विक्र ी करण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिल्याने व्यथित झालेल्या दीपक ठाकरे या शेतकºयाने तहसीलदार कार्यालयासमोर भात पेटवून देण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे खरेदी-विक्री संचालक मंडळात खळबळ उडाली असून अध्यक्ष मधुकर केदार व उपाध्यक्ष जगन्नाथ घुडे, प्रकाश पवार यांनी ते धान्य खरेदी करण्याचे आदेश मिळावेत, म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला साकडे घातले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना मुरबाड खरेदी-विक्र ी संघाकडून मात्र शेतकºयांचे ते आदेश पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार ठाकरे यांच्यासंदर्भात घडला. ठाकरे यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. ते शंभर ते दीडशे पोती भात पिकवतात. त्यातील आपल्या परिवारासाठी लागणारे धान्य साठवून ठेवतात व काही धान्य हे विक्र ी करून आपला घरखर्च भागवतात. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले. खळ्यातील धान्य हे भिजल्याने भाताला बुरशी आल्यामुळे ते थोड्या प्रमाणात काळसर पडले आहे. मात्र, त्यातील दाणा हा पांढरा असताना हे धान्य खाजगी व्यापारी कवडीमोलाने घेतात. तेच धान्य सरकारच्या खरेदी-विक्री संघाला विकले जाते. ठाकरे यांनी धान्य संघाच्या खरेदी केंद्रात नेले असता ते काळे पडले आहे, त्याला बुरशी आली आहे, अशी कारणे देत ते खरेदी करण्यास भातखरेदी केंद्राने नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या ठाकरे यांनी धान्य इतरत्र फेकून देण्यापेक्षा ते तहसीलदार कार्यालयासमोर पेटवून देणार असल्याचे निवेदन तहसीलदार, खरेदी-विक्र ी संघ व मुरबाड पोलीस ठाणे यांना सादर केले.शेतकºयांमधील असंतोष लक्षात घेता खरेदी-विक्री संघाने सरसकट भातखरेदी करण्याचे आदेश मिळण्यासाठी तहसीलदारांमार्फत राज्य सरकार व अन्न नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभाग व मार्केटिंग फेडरेशन यांना साकडेघातले आहे. 

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी