शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:15 IST

ठाणे-पालघरने मागितले ७४ कोटी, दिले अवघे १७.९४ कोटी

- नारायण जाधवठाणे : क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट असून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. त्यानुसार सध्या राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखाली चिरडलेल्या या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी राज्य शासनाने राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन्ही जिल्ह्यांसाठी अवघी १७ कोटी ९३ लाख ७६ हजार इतकी तुटपुंजी मदत वितरित करून मीठ चोळले आहे.यात ठाण्याचा वाटा आठ कोटी २० लाख ६८ हजार तर पालघरचा हिस्सा नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचा आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ती देण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरीलभातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयेवरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपयेनागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजाररायगड जिल्ह्याला अवघी पाच कोटी १७ लाख १४ हजार इतकी नुकसानभरपाई मिळणार आहे.असे अंदाजे ३४ कोटींची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात राज्य शासनाने सोमवारी ठाणे जिल्ह्यांकरीता अवघी आठ कोटी २० लाख ६८ हजार नुकसानभरपाई वितरीत करून संकटग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळले आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांसाठी ही मदत दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार इतकी आहे. यात शेतपिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी ती हेक्टरी १८ हजार इतकी तुटपुंजी आहे.77128 शेतकºयांचे अवेळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला होता.३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई नाहीविशेष म्हणजे जी तुटपुंजी मदत केली आहे ती प्रचलित शासने नियमानुसार 33 टक्के किंवा त्याहून जास्त ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनाच मिळणार असून याठिकाणीही ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकºयांना कोणतीही नुकसान मिळणार नसल्याने शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.मच्छीमार मदतीच्या प्रतीक्षेतपालघरमध्ये शेतकºयांसह मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकºयांना तुटपुंजी मदत जाहिर करणाºया शासनाने मच्छिमारांना कोणतीच मदत वितरीत केलेली नाही. हिच अवस्था ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांचीही आहे. त्यांना नुकसानभरपार्ई कधी मिळणार, या प्रतीक्षेत दोन्ही जिल्ह्यांतील मच्छिमार आहेत.पालघर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुन्या शासकीय निकषानुसार ३५ - ४० कोटी रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तेथील जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र, प्रत्यक्षात पालघरच्या वाट्याला नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचीच नुकसानभरपाई शासनाने वितरीत केली आहे.दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकºयांना सोडले वाºयावरअवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकºयांची १०० टक्के शेती नष्ट झाली असली तरी राज्य शासनाने मदत देतांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत वितरीत केली आहे. ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई न देता शासनाने वाºयावर सोडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी