शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

एकत्र कुटुंबाची विण झाली घट्ट, कोरोना काळात कौटुंबिक संवादात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:33 IST

कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचा आधार घेतला असून मागील पावणेदोन महिने नागरिकांना सक्तीने घरी बसावे लागले. या काळात अनेकांना रोजगाराला मुकावे लागले असून आर्थिक कळ सोसावी लागत आहे. एका बाजूने ही झळ सोसताकोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.ना दुसरीकडे मात्र एवढा मोठा कालावधी एकत्र घालविल्यानंतर कुटुंबीयांमधील संवाद वाढून वातावरण सकारात्मक बनल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पालघर जिल्हा हा मुंबई आणि उपनगराला लागून असल्याने ग्रामीण भागातील शिकलेले लोक शहरात वास्तव्यास गेले, काहींनी शेती सोडून औद्योगिक वसाहतीत नोकरी स्वीकारली. स्थानिक नोकरीकरिता ये-जा करू लागले. चर्चगेट ते डहाणू लोकल सेवा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढले. दरम्यान आर्थिक सुबत्ता आणि शहरी मानसिकतेमुळे भावकीतील दुरावा वाढला. शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला कमी लेखले जाऊ लागल्याने अबोला, भांडणाच्या प्रसंगात वाढ झाली. शेजाºया-शेजाऱ्यांमध्येही विसंवाद वाढलेला दिसला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन अमलात आणल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. यामुळे एकटेच राहणाºयांचा दिवस जाता जाईना. तर दुसºया टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शेतकºयांना शेतमाल निर्यात आणि कृषी कामासाठी बाहेर पडता येऊ लागल्याने शेतकºयांचे महत्त्व वाढले. त्यामुळे इच्छा नसली तरी गरज म्हणून शेतरस्ता विसरलेल्यांची पावले वडिलोपार्जित शेतजमिनीकडे वळू लागली.पूर्वी कौटुंबिक वादामुळे शिवारातील करवंद, धामनं, ताडगोळे, आंबा, चिंचा, बोकरं, काजू अशा रानमेव्याची नासाडी व्हायची, मात्र आता संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने त्याचा आस्वाद घेऊ लागली आहेत. या मनोमीलनामुळे ओस पडलेल्या शेतीच्या तुकड्यांवर भावंडांनी एकत्रित येऊन कुंपण घातल्याने शेतीचे महत्त्व अधोरेखित झाल्याची उदाहरणे गावागावातून पाहायला मिळत आहेत. ही तेढभावना कमी झाल्याने आगामी खरीप हंगामात जिल्ह्यातील भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून शेतीला सुगीचे दिवस आल्याची सकारात्मकता कृषीभूषण यज्ञेश सावे यांनी बोलून दाखवली आहे.लॉकडाउनमुळे एकलकोंडे जीवन जगलेल्यांना एकत्र कुटुंबाचे महत्त्व उमगले आहे. मनातील दुराव्यामुळे जमिनीवर ओढण्यात आलेली तेढीची रेषा पुसट बनल्याने आगामी खरीप हंगामात त्याचा सकारात्मक बदल शेती क्षेत्रातून नक्कीच दिसून येईल.- कृषिभूषण यज्ञेश सावे

टॅग्स :FamilyपरिवारSocialसामाजिक