शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे अनेकांनी घराकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 06:37 IST

लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते.

जितेंद्र कालेकर -ठाणे : कौटुंबिक कारणातून तसेच प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही  ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून ३,१९४ जण बेपत्ता झाले. त्यातील १,७९७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.    लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. काहींना अल्पवयातच आपल्या जोडीदाराकडे जाण्याची ओढ लागते. मग, घरातील विरोध झुगारून पळून जाण्याची तयारी ही मुले ठेवतात. अनेक प्रकरणांत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत ती नेमकी कशामुळे व कशी बेपत्ता झाली, याची माहिती सुरुवातीला उपलब्ध नसते. त्यामुळे यात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अपहरण झाले असल्यास संबंधित आरोपींचाही शोध घेतला जातो.कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस तत्काळ तपास सुरू करतात. तक्रार मात्र २४ तासांनी दाखल होते. २०१९ मध्ये २०३० पुरुष तर २,४३२ महिला बेपत्ता झाल्या. त्यातील १,६९६ पुरुष व २,१५४ महिलांचा शोध लागला आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. 

घर सोडून जाण्याचे कारणव्यक्ती व कुटुंबपरत्वे मुले, मुली आणि प्रौढ व्यक्तींमध्ये घर सोडण्याची कारणे ही वेगवेगळी असली तरी बऱ्याच प्रकरणांत पती-पत्नींमधील विकोपाला जाणारे वाद, प्रेमप्रकरणामध्ये घरातून लग्नाला विरोध असल्यास मुले आणि मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय कर्जबाजारीपणा, मनोरुग्ण किंवा स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्ती घरातून बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.२०२० मध्ये एकूण ३,१९४ बेपत्ता झाले. तर १,७९७ जणांचा शोध लागला.

 

टॅग्स :Familyपरिवारthaneठाणे