शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Coronavirus News: वडिलांच्या अंत्यसंस्काराला कुटुंब मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 00:49 IST

जावयाने केले अंत्यविधी; संकटांचा डोंगरच उभा, संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा विळखा

- पंकज पाटील अंबरनाथ : घरातील ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या ८० वर्षीय वृद्ध वडिलांना त्यांच्या मुलांनी उपचार मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. उपचाराला चार दिवस उलटत नाही तोच घरातील सर्व सदस्य कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल आला. या पाठोपाठच त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची बातमीही आली. एकापाठोपाठ एक संकट ओढवल्याने हे कुटुंब चिंतेत पडले. त्यातच आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणालाच जाता न आल्याने त्याचे शल्य सर्वाधिक होते. अखेर जावयाने बुधवारी पहाटे अंत्यसंकार केले. अंबरनाथ कानसई सेक्शन परिसरात राहणारे एक ज्येष्ठ यांना ११ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाले. त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली. मात्र त्रास वाढल्याने त्यांना डॉक्टरांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने कोणत्याच रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. अखेर अंबरनाथ पालिकाचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्या मध्यस्थीने त्या व्यक्तीला बदलापूरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.१३ जून रोजी रात्री त्यांना या रुग्णालयात दाखल केले त्यावेळेस त्यांची प्रकृती गंभीर होती. वडिलांवर उपचार सुरू असताना त्यांच्या लहान मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. त्या मुलाला कुटुंबीयांनी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले. कुटुंबातील एक सदस्य कोरोनाग्रस्त झाल्याने आणि दुसरा रुग्ण मृत्यूशी झुंज देत असल्याने सगळे हतबल झाले होते. कोरोना चाचणीचा अहवाल न आल्याने त्या वृद्ध व्यक्तीवर बदलापूरच्या रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत गेली आणि त्यांची मृत्यूशी झुंज सुरू झाली. याच दरम्यान घरातील इतर सहा सदस्यही कोरोनाग्रस्त झाल्याचा अहवाल आल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. या सर्वांना अंबरनाथ पालिकेने रुग्णालयात दाखल केले. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोच वडिलांच्या निधनाची बातमी आली. चाचणी अहवाल येण्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनसमोर मोठे संकट उभे राहिले होते.कोणताही नियम न मोडता व आग्रह न करता त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांचा हा निर्णय जड अंतकरणाने घेतला होता. जवळचा एकही नातेवाईक अंत्यविधीसाठी जाऊ शकत नसल्याने त्या व्यक्तीच्या जावयाला अंत्यविधीसाठी बोलावले. रुग्णालयात मृतदेह जास्त वेळ ठेवता येत नसल्याने लागलीच रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अवघ्या सात ते आठ सदस्यांच्या उपस्थित अंत्यविधी केले.आम्ही आयुष्यात असा विचार केला नव्हता. वडिलांच्या शेवटच्या क्षणी आम्ही त्यांच्याजवळ राहू शकलो नाही, याचे दु:ख आयुष्यभर राहील. त्यांचे अंत्यदर्शनही आम्हाला घेता आले नाही.- मृत व्यक्तीचा लहान मुलगावडिलांना दाखल करण्यासाठी मी बदलापूरच्या रुग्णालयात गेलो होतो. त्यांना दाखल केल्यानंतर मी स्वत:ची चाचणी केली. माझा अहवाल येण्याआधीच वडिलांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच माझाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अंत्यसंस्काराला जाता आले नाही. घरातील सर्व सदस्य कोरोनाग्रस्त असताना अंत्यसंस्कारासाठी किमान मला जाता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही पूर्ण झाली नाही.- मृत व्यक्तीचा मोठा मुलगा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या