शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

प्रकल्प चालवण्यास अपयश, सर्वाेच्च न्यायालयाने फटकारूनही सुधारणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:31 IST

सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली.

- धीरज परब मीरा रोड : सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकल्प राबवण्यात पालिका अपयशी ठरली. केवळ निविदा व टक्केवारीतच त्यांना रस होता. त्यामुळे प्रकल्पच चालवला गेला नाही.११ वर्षांत येथे शहरातील रोजचा कचरा बेकायदा टाकल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहिले. डम्पिंगची समस्या गंभीर असून, आंदोलनाचे सावट आहे. घनकचरा हाताळणी व विल्हेवाटी बद्दलचे कायदे, नियम आदी सर्रास कचºयात टाकण्यात आले आहेत. हरित लवादा पासून सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही पालिकेला त्याची जराही लाज नाही.२००७ मध्ये पालिकेने हेंजर बायोटेक कंत्राटदारास घनकचरा प्रकल्प उभारण्याची परवानगी दिली. कचºयाच्या दुर्गंधीमुळे २०१० मध्ये ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.त्यामुळे प्रकल्प वरसावे येथे स्थलांतरित करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. पण, प्रकल्प स्थलांतराला राजकीय विरोध झाला. पुढे सकवार, तळोजा, वसई-विरार आदी पर्यायही पुढे आले. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. तर, कंत्राटदारनेही पळ काढला.मीरा-भार्इंदर शहरात दररोज ५०० टन कचरा गोळा होतो. मात्र, त्याचे ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी, दूषित पाणी, विषारी वायू व आगी लागत असल्याने प्रदूषण होत आहे. २००७ पासून येथे १० लाख मेट्रिक टन पेक्षा कचरा साचला आहे. कचरा उचलणे, कचरा व्यवस्थापन यासाठी १०० कोटींचा खर्च वर्षाला होत आहे.स्थानिकांच्या संघर्ष समितीने डम्पिंगविरोधात हरित लवादाकडे धाव घेतली. २०१५ मध्ये लवादाने पालिकेला प्रकल्पासाठी ७० कोटी भरण्याचे व सर्वच कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचे आदेशदिले. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयात जाऊन या आदेशास स्थगिती मिळवली. त्यानंतर उच्च न्यायालयाने उडवून लावल्याने पालिका सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे शेवटी पालिकेला पाच कोटी रुपये प्रकल्पासाठी भरण्याचे आदेश झल्याने नाईलाजाने पालिकेला ते भरावे लागले.उच्च न्यायालयाने आयआयटीसोबत कचºयावर प्रक्रि या करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. पण पालिकेने कोणत्याच यंत्रणांचे निर्देश पाळले नाहीत. हरित लवादानेही बांधकाम बंदीची तंबी दिली होती.महापौर, आयुक्त आदींविरोधात नाईलाजाने का असेना प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी दावा दाखल केला. पण आजही परिस्थिती सुधारलेली नाही. सध्या दिल्लीत हरित लवादाकडे हे प्रकरण सुरू आहे .>अर्थसंकल्पामध्ये आठ कोटींची तरतूदकचºयावर बायो मायनिंगचा उतारा काढण्यात आला. ८३ कोटी ८३ लाखांचा खर्च अपेक्षित असताना अर्थसंकल्पात आठ कोटींची तरतूद झाली.सध्याचा कंत्राटदार सुक्या कचºयावर प्रक्रि या करत असल्याचे सांगत असला तरी त्याच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही. त्याने केवळ दीडशे टनचा प्रकल्प उभारला आहे. प्रत्यक्षात मात्र, हा सर्व दिखाऊपणाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतआहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड