शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

प्रकल्प चालवण्यास अपयश, सर्वाेच्च न्यायालयाने फटकारूनही सुधारणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:31 IST

सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली.

- धीरज परब मीरा रोड : सरकारने उत्तन धावगी डोंगरावर मीरा-भार्इंदर पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी ३१.४६ हेक्टर जागा मोफत दिली. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकल्प राबवण्यात पालिका अपयशी ठरली. केवळ निविदा व टक्केवारीतच त्यांना रस होता. त्यामुळे प्रकल्पच चालवला गेला नाही.११ वर्षांत येथे शहरातील रोजचा कचरा बेकायदा टाकल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहिले. डम्पिंगची समस्या गंभीर असून, आंदोलनाचे सावट आहे. घनकचरा हाताळणी व विल्हेवाटी बद्दलचे कायदे, नियम आदी सर्रास कचºयात टाकण्यात आले आहेत. हरित लवादा पासून सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही पालिकेला त्याची जराही लाज नाही.२००७ मध्ये पालिकेने हेंजर बायोटेक कंत्राटदारास घनकचरा प्रकल्प उभारण्याची परवानगी दिली. कचºयाच्या दुर्गंधीमुळे २०१० मध्ये ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.त्यामुळे प्रकल्प वरसावे येथे स्थलांतरित करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. पण, प्रकल्प स्थलांतराला राजकीय विरोध झाला. पुढे सकवार, तळोजा, वसई-विरार आदी पर्यायही पुढे आले. पण प्रत्यक्षात काही झाले नाही. तर, कंत्राटदारनेही पळ काढला.मीरा-भार्इंदर शहरात दररोज ५०० टन कचरा गोळा होतो. मात्र, त्याचे ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी, दूषित पाणी, विषारी वायू व आगी लागत असल्याने प्रदूषण होत आहे. २००७ पासून येथे १० लाख मेट्रिक टन पेक्षा कचरा साचला आहे. कचरा उचलणे, कचरा व्यवस्थापन यासाठी १०० कोटींचा खर्च वर्षाला होत आहे.स्थानिकांच्या संघर्ष समितीने डम्पिंगविरोधात हरित लवादाकडे धाव घेतली. २०१५ मध्ये लवादाने पालिकेला प्रकल्पासाठी ७० कोटी भरण्याचे व सर्वच कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचे आदेशदिले. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयात जाऊन या आदेशास स्थगिती मिळवली. त्यानंतर उच्च न्यायालयाने उडवून लावल्याने पालिका सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे शेवटी पालिकेला पाच कोटी रुपये प्रकल्पासाठी भरण्याचे आदेश झल्याने नाईलाजाने पालिकेला ते भरावे लागले.उच्च न्यायालयाने आयआयटीसोबत कचºयावर प्रक्रि या करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. पण पालिकेने कोणत्याच यंत्रणांचे निर्देश पाळले नाहीत. हरित लवादानेही बांधकाम बंदीची तंबी दिली होती.महापौर, आयुक्त आदींविरोधात नाईलाजाने का असेना प्रदूषण नियंत्रण मंडळाने फौजदारी दावा दाखल केला. पण आजही परिस्थिती सुधारलेली नाही. सध्या दिल्लीत हरित लवादाकडे हे प्रकरण सुरू आहे .>अर्थसंकल्पामध्ये आठ कोटींची तरतूदकचºयावर बायो मायनिंगचा उतारा काढण्यात आला. ८३ कोटी ८३ लाखांचा खर्च अपेक्षित असताना अर्थसंकल्पात आठ कोटींची तरतूद झाली.सध्याचा कंत्राटदार सुक्या कचºयावर प्रक्रि या करत असल्याचे सांगत असला तरी त्याच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही. त्याने केवळ दीडशे टनचा प्रकल्प उभारला आहे. प्रत्यक्षात मात्र, हा सर्व दिखाऊपणाच असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतआहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड