शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पाण्याचा निचरा करण्यात अपयश, कल्याण-डोंबिवलीतील सखल भाग, चाळींमधील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:54 IST

कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या.

कल्याण - कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, साचलेल्या पाण्यातच दिवसरात्र काढण्याची वेळ नागरिकांवर आली. पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती.कल्याण-डोंबिवली परिसरात मागील दिवसभरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत एकूण एक हजार ३२४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाची एकूण नोंद पाहता मागील वर्षीच्या तुलनेत २७० मिलिमीटर पावसाची नोंद अधिक झाली आहे.सोमवारी पहाटेपासून पडणाºया पावसामुळे कल्याणच्या शिवाजी चौकात, महंमद अली चौकात, चिकणघर, साईनाथ कॉलनी, रामदासवाडी, गणेश मंदिर, ओम साई, शुभम व चंद्रगिरी सोसायटी आदी परिसर जलमय झाला. पूर्वेतील कल्याण-मलंग रोड, नांदिवली, आडिवली, ढोकळी आणि पिसवली परिसरातील घराघरांमध्ये पाणी शिरले.पिसवलीतील रहिवासी मनोज तिवारी म्हणाले, तीन दिवसांपासून घरात पाणी शिरले आहे. ते ओसरलेले नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही.डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील डॉ. राथ रोड, पाटकर रस्ता, नेहरू रोड, नांदिवली मठ परिसर, लोढा हेवन येथील सखल भागात, भोपर येथे काही ठिकाणी पाणी साचले होते. एमआयडीसीतील निवासी परिसरात सुदर्शनगर आणि मिलापनगर परिसरातील साचलेल्या पाण्याची स्थिती जैसे थे होती. साईबाबा मंदिर, ग्रीन्स स्कूल, अभिनव शाळा, कावेरी चौकातील पाण्याचा निचरा झालेला नव्हता. तर, पश्चिमेतील महात्मा फुले रस्ताही पाण्याखाली गेला होता.डोंबिवलीतील अनेक कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून तळे झाले होते. फेज-२ मधील मेट्रोपोलिटन एक्झाकेम कंपनीत तीन फूट पाणी होते. त्यामुळे कामगार कामावर आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून औद्योगिक परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कंपनीमालकांना नुकसान सोसावे लागत आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी यांनी दिली.पंचायत समितीत प्लास्टर कोसळलेकल्याण पंचायत समितीच्या छताचे प्लास्टर पावसामुळे कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. यापूर्वीही प्लास्टर पडल्याची घटना झाली होती. ही इमारत धोकादायक असल्याने तिच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीने पाठवला आहे. मात्र, अद्याप दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. हे कार्यालय गोवेली येथे हलवण्याचे प्रस्तावित असल्याने नवी इमारत बांधणे अथवा स्थलांतर करण्याबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, कर्मचारी व अधिकारी धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून काम करतात.आपत्कालीनचाप्रतिसाद शून्यमहापालिकेच्या आपत्कालीन पथकाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. या कक्षात २४ तास कर्मचारी तैनात असतात, असा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे कर्मचारी आलेच नाहीत, अशी ओरड घरात पाणी शिरलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.ठाणे, मुंबई परिसरातही अशीच परिस्थिती-आयुक्तमहापालिका हद्दीत नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नसल्याचा आरोप नागरिक आणि राजकीय मंडळींकडून होत आहे. त्यावर, आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, जलमय परिस्थिती व पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता केवळ कल्याण-डोंबिवलीच जलमय झाली नाही, तर ठाणे, मुंबई महापालिका परिसरातही हीच स्थिती आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नालेसफाई झाली नाही, या आरोपात तथ्य नाही.महापौर, उपमहापौरांकडून पाहणीकोळसेवाडी : मलंगपट्टी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पेट्रोलपंपासमोरील बहुतांश चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. नागरिकांच्या तक्र ारीवरून महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोईर आदींनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. अतिक्रमण आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळे पाण्याचा निचरा न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. त्यावर गटारांऐवजी नाले बांधण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाºयांना दिल्या.कल्याण पूर्वेतील आमराई परिसर, सह्याद्री, जीवनछाया, शिवनेरी, शामानंता, मानव कॉलनी आदी भागांतील चाळींमध्ये नुकतेच गुघडाभर पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन जाब विचारला. रविवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी या भागाची पाहणी केली. गटारातील पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर, तेथे कार्यवाही करण्यात आली. मात्र, कायमस्वरूपी नाला बांधण्याची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या