शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

पाण्याचा निचरा करण्यात अपयश, कल्याण-डोंबिवलीतील सखल भाग, चाळींमधील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:54 IST

कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या.

कल्याण - कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, साचलेल्या पाण्यातच दिवसरात्र काढण्याची वेळ नागरिकांवर आली. पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती.कल्याण-डोंबिवली परिसरात मागील दिवसभरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत एकूण एक हजार ३२४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाची एकूण नोंद पाहता मागील वर्षीच्या तुलनेत २७० मिलिमीटर पावसाची नोंद अधिक झाली आहे.सोमवारी पहाटेपासून पडणाºया पावसामुळे कल्याणच्या शिवाजी चौकात, महंमद अली चौकात, चिकणघर, साईनाथ कॉलनी, रामदासवाडी, गणेश मंदिर, ओम साई, शुभम व चंद्रगिरी सोसायटी आदी परिसर जलमय झाला. पूर्वेतील कल्याण-मलंग रोड, नांदिवली, आडिवली, ढोकळी आणि पिसवली परिसरातील घराघरांमध्ये पाणी शिरले.पिसवलीतील रहिवासी मनोज तिवारी म्हणाले, तीन दिवसांपासून घरात पाणी शिरले आहे. ते ओसरलेले नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही.डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील डॉ. राथ रोड, पाटकर रस्ता, नेहरू रोड, नांदिवली मठ परिसर, लोढा हेवन येथील सखल भागात, भोपर येथे काही ठिकाणी पाणी साचले होते. एमआयडीसीतील निवासी परिसरात सुदर्शनगर आणि मिलापनगर परिसरातील साचलेल्या पाण्याची स्थिती जैसे थे होती. साईबाबा मंदिर, ग्रीन्स स्कूल, अभिनव शाळा, कावेरी चौकातील पाण्याचा निचरा झालेला नव्हता. तर, पश्चिमेतील महात्मा फुले रस्ताही पाण्याखाली गेला होता.डोंबिवलीतील अनेक कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून तळे झाले होते. फेज-२ मधील मेट्रोपोलिटन एक्झाकेम कंपनीत तीन फूट पाणी होते. त्यामुळे कामगार कामावर आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून औद्योगिक परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कंपनीमालकांना नुकसान सोसावे लागत आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी यांनी दिली.पंचायत समितीत प्लास्टर कोसळलेकल्याण पंचायत समितीच्या छताचे प्लास्टर पावसामुळे कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. यापूर्वीही प्लास्टर पडल्याची घटना झाली होती. ही इमारत धोकादायक असल्याने तिच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीने पाठवला आहे. मात्र, अद्याप दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. हे कार्यालय गोवेली येथे हलवण्याचे प्रस्तावित असल्याने नवी इमारत बांधणे अथवा स्थलांतर करण्याबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, कर्मचारी व अधिकारी धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून काम करतात.आपत्कालीनचाप्रतिसाद शून्यमहापालिकेच्या आपत्कालीन पथकाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. या कक्षात २४ तास कर्मचारी तैनात असतात, असा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे कर्मचारी आलेच नाहीत, अशी ओरड घरात पाणी शिरलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.ठाणे, मुंबई परिसरातही अशीच परिस्थिती-आयुक्तमहापालिका हद्दीत नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नसल्याचा आरोप नागरिक आणि राजकीय मंडळींकडून होत आहे. त्यावर, आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, जलमय परिस्थिती व पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता केवळ कल्याण-डोंबिवलीच जलमय झाली नाही, तर ठाणे, मुंबई महापालिका परिसरातही हीच स्थिती आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नालेसफाई झाली नाही, या आरोपात तथ्य नाही.महापौर, उपमहापौरांकडून पाहणीकोळसेवाडी : मलंगपट्टी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पेट्रोलपंपासमोरील बहुतांश चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. नागरिकांच्या तक्र ारीवरून महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोईर आदींनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. अतिक्रमण आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळे पाण्याचा निचरा न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. त्यावर गटारांऐवजी नाले बांधण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाºयांना दिल्या.कल्याण पूर्वेतील आमराई परिसर, सह्याद्री, जीवनछाया, शिवनेरी, शामानंता, मानव कॉलनी आदी भागांतील चाळींमध्ये नुकतेच गुघडाभर पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन जाब विचारला. रविवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी या भागाची पाहणी केली. गटारातील पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर, तेथे कार्यवाही करण्यात आली. मात्र, कायमस्वरूपी नाला बांधण्याची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या