शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सरवली एमआयडीसी परिसरातील कारखाने जलप्रदूषणास जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:02 IST

केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे.

कल्याण - केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे. तेथील रासायनिक कारखान्यांतून रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात आहे, असा आरोप केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. खाडी प्रदूषित करणाºया कारखान्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण येथील कार्यालयाकडे त्यांनी केली आहे.‘कचºयामुळे होतेय जलप्रदूषण’ या मथळ्याखाली वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २६ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत म्हात्रे म्हणाले, डम्पिंगच्या कचºयापेक्षा कोन गावाच्या दिशेने सरवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाºया रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी जास्त प्रदूषित होत आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याला दुर्गंधी येते. खाडीतील जैवविविधताही धोक्यात आली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे.म्हात्रे पुढे म्हणाले, डोंबिवलीतील प्रदूषणाच्या प्रश्नाकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष नाही. डोंबिवली एमआयडीसीत फेज १ व २ मध्ये दोन सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (सीईटी) कार्यरत आहेत. असे असूनही प्रदूषणाच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. प्रदूषण रोखण्याऐवजी सरकारी संस्था एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप करत आहेत. सरवली एमआयडीसीत सीईटी नाही. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयातील प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केली आहे. त्याची दखल घेत त्यांनी बुधवारी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.आरोपांत तथ्य नाहीकामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, सरवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी केंद्र नाही. मात्र, प्रत्येक कारखान्याने सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था कारखान्याच्या आवारात करून त्यावर प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे.त्यानुसार कारखानदार त्यांच्या आवारात स्वत:च्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून सोडत आहेत. त्यामुळे सरवली एमआयडीतीली रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियाच केली जात नाही. ते थेट प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाते, या आरोपात मला तरी तथ्य वाटत नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळ व हरित लवाद आहे. त्यामुळे कोणताही कारखानदार अशा प्रकारचे प्रदूषण करण्यास धजावणार नाही, असे मला तरी वाटते, असे सोनी म्हणाले.

टॅग्स :pollutionप्रदूषणdombivaliडोंबिवली