शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कचरा विल्हेवाटीला सेनेची पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:34 IST

ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे.

ठाणे : ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. या सोसायट्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पुन्हा ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, वारंवार देण्यात येणाºया या मुदतवाढीमुळे सोसायट्यांंचे संचालक सुस्त झाले आहेत. दुसरीकडे यामध्ये पुन्हा राजकीय हस्तक्षेप होणार असल्याची माहिती समोर येत असून निवडणुकीच्या तोंडावर ही कोंडी नको, अशी भूमिका घेत सत्ताधारी शिवसेना पुन्हा तारीख पे तारीख देणार असल्याची माहिती समोर आली आहे.महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही बोंब नसून इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करण्यात यावे, यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर, कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, केंद्र सरकारने मागील वर्षी अध्यादेश काढला. या अध्यादेशात ज्या सोसायट्या अथवा आस्थापना यांच्याकडून प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती होते, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कचºयाची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेने या अध्यादेशानुसार सर्व्हे करून प्रभाग समितीमधील तब्बल चारशेहून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर, याविरोधात महासभेत आवाज उठवण्यात आल्यानंतर पालिकेने कचºयाची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर, पुन्हा नोटीस देण्याचा पत्रप्रपंच केला होता. परंतु, त्यानंतरही सोसायट्यांनी कोणत्याही हालचाली न केल्याने महापालिकेने या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचे निश्चित केले होते. या निर्णयास प्रथम १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्याचे कारण देऊन ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. परंतु अद्यापही सोसायट्यांनी कचºयाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही.पुन्हा होणार राजकीय हस्तक्षेप...कचराकोंडी रोखण्यासाठी आता पुन्हा राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कचराकोंडीमुळे त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, असा कयास सत्ताधाºयांनी किंबहुना इतर पक्षांनीसुद्धा लावला आहे. त्यामुळेच किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत पुन्हा सोसायटीवाल्यांच्या बाजूने उभे राहून कचराकोंडी रोखण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.मोहिमांचे काय झाले? : मध्यंतरी कचºयाची विल्हेवाट न लावल्यास पालिकेने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. तसेच शून्य कचरा मोहीम सुरू केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. शिवाय, ज्या सोसायट्या कचºयाची विल्हेवाट लावून खत तयार करतील, त्यांच्या खताचे ब्रँडिंग करून बाजार उपलब्ध करून देण्याची हमी पालिकेने दिली होती. मात्र, या मोहिमा कागदापलीकडे पुढे सरकलेल्या नाहीत.सोसायट्यांचा पुन्हा एल्गार...३१ आॅक्टोबरनंतर कचराकोंडी होणार, हे लक्षात येत असतानाच शहरातील काही महत्त्वाच्या सोसायट्यांच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन कचºयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पालिकेची असल्याचे सांगून पालिकेने जबरदस्ती केली, तर न्यायालयात जाऊ, असा इशारा देऊन पालिकेविरोधात एल्गार पुकारला आहे.दोन दिवसांत घेणार बैठककचराकोंडीवर येत्या दोन दिवसांत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा बैठक घेणार आहेत. या बैठकीतून सोसायटीवाल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून पुन्हा तारीख पे तारीख मिळणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. परंतु, यामुळे शासनाच्या आदेशाचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका