शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:56 IST

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म्हारळ : उल्हास नदीच्याप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच कांबा येथे नदीपात्रातील जलपर्णीत हजारो मासे मृत्युमुखी पडून सडा पडला आहे. मासे कुजल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासे मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच नदीतून स्टेम प्राधिकरण, केडीएमसी आणि एमआयडीसी पाणी उचलत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णीमुळेच या परिसरात मासे मृत्युमुखी पडल्याचे सांगत लघुपाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.नदीपात्राला जलपर्णीने अक्षरश: विळखा घातला आहे. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायूच नष्ट झाल्यामुळे शिवरा, तेलप्पा (काळा मासा), करवली, मळे, शिमटे मासे मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी जलपर्णीत या माशांचा अक्षरश: खच पडला आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ही समस्या आणखी उग्र रूप घेईल, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.याविषयी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी शहाड तसेच केडीएमसीमार्फत जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही वनस्पती प्रचंड वाढल्याने या कामाला विलंब होत आहे.दरम्यान, उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते. नदीपात्रातून स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी तसेच केडीएमसी पाणी उचलते.स्टेम आणि एमआयडीसीकडून ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांना आणि कल्याण ग्रामीण परिसरात पाणीपुरवठा केला जातो. केडीएमसीने नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले असले, तरी लघुपाटबंधारे विभागाची अनास्था चिंतेचा विषय ठरत आहे.जलचरांच्या जीवावरलघुपाटबंधारे विभागातील नदीतील जलपर्णी वेळीच काढण्यात आली असती, तर माशांचा मृत्यू झाला नसता. या प्रकारामुळे नदी प्रदूषित होत असून जलचरांच्या जीवावर बेतत असल्याचे कांबाचे ग्रामस्थ पावशे यांनी सांगितले. नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने कोळी, आदिवासींच्या मासेमारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रायते गावचे ग्रामस्थ ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण