शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:56 IST

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म्हारळ : उल्हास नदीच्याप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच कांबा येथे नदीपात्रातील जलपर्णीत हजारो मासे मृत्युमुखी पडून सडा पडला आहे. मासे कुजल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासे मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच नदीतून स्टेम प्राधिकरण, केडीएमसी आणि एमआयडीसी पाणी उचलत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णीमुळेच या परिसरात मासे मृत्युमुखी पडल्याचे सांगत लघुपाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.नदीपात्राला जलपर्णीने अक्षरश: विळखा घातला आहे. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायूच नष्ट झाल्यामुळे शिवरा, तेलप्पा (काळा मासा), करवली, मळे, शिमटे मासे मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी जलपर्णीत या माशांचा अक्षरश: खच पडला आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ही समस्या आणखी उग्र रूप घेईल, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.याविषयी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी शहाड तसेच केडीएमसीमार्फत जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही वनस्पती प्रचंड वाढल्याने या कामाला विलंब होत आहे.दरम्यान, उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते. नदीपात्रातून स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी तसेच केडीएमसी पाणी उचलते.स्टेम आणि एमआयडीसीकडून ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांना आणि कल्याण ग्रामीण परिसरात पाणीपुरवठा केला जातो. केडीएमसीने नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले असले, तरी लघुपाटबंधारे विभागाची अनास्था चिंतेचा विषय ठरत आहे.जलचरांच्या जीवावरलघुपाटबंधारे विभागातील नदीतील जलपर्णी वेळीच काढण्यात आली असती, तर माशांचा मृत्यू झाला नसता. या प्रकारामुळे नदी प्रदूषित होत असून जलचरांच्या जीवावर बेतत असल्याचे कांबाचे ग्रामस्थ पावशे यांनी सांगितले. नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने कोळी, आदिवासींच्या मासेमारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रायते गावचे ग्रामस्थ ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण