शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:56 IST

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म्हारळ : उल्हास नदीच्याप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच कांबा येथे नदीपात्रातील जलपर्णीत हजारो मासे मृत्युमुखी पडून सडा पडला आहे. मासे कुजल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासे मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच नदीतून स्टेम प्राधिकरण, केडीएमसी आणि एमआयडीसी पाणी उचलत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णीमुळेच या परिसरात मासे मृत्युमुखी पडल्याचे सांगत लघुपाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.नदीपात्राला जलपर्णीने अक्षरश: विळखा घातला आहे. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायूच नष्ट झाल्यामुळे शिवरा, तेलप्पा (काळा मासा), करवली, मळे, शिमटे मासे मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी जलपर्णीत या माशांचा अक्षरश: खच पडला आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ही समस्या आणखी उग्र रूप घेईल, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.याविषयी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी शहाड तसेच केडीएमसीमार्फत जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही वनस्पती प्रचंड वाढल्याने या कामाला विलंब होत आहे.दरम्यान, उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते. नदीपात्रातून स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी तसेच केडीएमसी पाणी उचलते.स्टेम आणि एमआयडीसीकडून ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांना आणि कल्याण ग्रामीण परिसरात पाणीपुरवठा केला जातो. केडीएमसीने नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले असले, तरी लघुपाटबंधारे विभागाची अनास्था चिंतेचा विषय ठरत आहे.जलचरांच्या जीवावरलघुपाटबंधारे विभागातील नदीतील जलपर्णी वेळीच काढण्यात आली असती, तर माशांचा मृत्यू झाला नसता. या प्रकारामुळे नदी प्रदूषित होत असून जलचरांच्या जीवावर बेतत असल्याचे कांबाचे ग्रामस्थ पावशे यांनी सांगितले. नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने कोळी, आदिवासींच्या मासेमारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रायते गावचे ग्रामस्थ ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण