शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अनुसूचित जातीजमातींच्या कल्याणावर १९० कोटी खर्च, अत्याचार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:40 IST

ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी ठाण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी ठाण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले.अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून योजनेतील पीडितांचे अनुदान, पेन्शन, नोकरीसंदर्भात अर्ज असल्यास ते तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवून त्यांनी अनुसूचित जातींच्या विकासासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, त्याचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यांना याविषयीची माहिती दिली तसेच उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी सादरीकरण केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक भीमनवार, भिवंडी-निजामपूर पालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये २०१७ मध्ये ३९ प्रकरणे झाली आणि त्यातील सर्व पीडितांना एकूण ३१ लाख ७५ हजार रु पये अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती सहायक संचालक समाजकल्याण उज्ज्वला सपकाळे यांनी दिली. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी तसेच सहायक पोलीस आयुक्त भोसले यांनीदेखील या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत तसेच जिल्ह्यात अतिशय कमी प्रकरणे झाली आहेत, अशी माहिती दिली.डॉ. विद्वान यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत तसेच रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना घरे मिळण्यात अडचण येणार नाही, हे पाहण्यास सांगितले. कृषी यांत्रिकीकरण तसेच महिला बचत गटांना शेतीची अवजारे देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांना व्यवस्थित होत आहे किंवा नाही, याविषयीही त्यांनी माहिती घेतली.  

टॅग्स :MONEYपैसा