शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीजमातींच्या कल्याणावर १९० कोटी खर्च, अत्याचार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:40 IST

ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी ठाण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात १९० कोटी रु पये अनुसूचित जाती व जमाती यांच्या कल्याणासाठी खर्च केले जात असून या जातींवरील अत्याचार प्रकरणे तुलनेने कमी असून पीडितांना अर्थसाहाय्यही होत असल्याबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी ठाण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले.अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून योजनेतील पीडितांचे अनुदान, पेन्शन, नोकरीसंदर्भात अर्ज असल्यास ते तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवून त्यांनी अनुसूचित जातींच्या विकासासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, त्याचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी त्यांना याविषयीची माहिती दिली तसेच उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी सादरीकरण केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक भीमनवार, भिवंडी-निजामपूर पालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये २०१७ मध्ये ३९ प्रकरणे झाली आणि त्यातील सर्व पीडितांना एकूण ३१ लाख ७५ हजार रु पये अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती सहायक संचालक समाजकल्याण उज्ज्वला सपकाळे यांनी दिली. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी तसेच सहायक पोलीस आयुक्त भोसले यांनीदेखील या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत तसेच जिल्ह्यात अतिशय कमी प्रकरणे झाली आहेत, अशी माहिती दिली.डॉ. विद्वान यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत तसेच रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना घरे मिळण्यात अडचण येणार नाही, हे पाहण्यास सांगितले. कृषी यांत्रिकीकरण तसेच महिला बचत गटांना शेतीची अवजारे देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांना व्यवस्थित होत आहे किंवा नाही, याविषयीही त्यांनी माहिती घेतली.  

टॅग्स :MONEYपैसा