शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

सोळा वर्षांत कचरा तितकाच,खर्च मात्र ५५० कोटींनी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:02 AM

घनकचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणायची होती. परंतु, त्यावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला.

ठाणे : घनकचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणायची होती. परंतु, त्यावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. घनकचरा विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून, या कारभाराची अ‍ॅण्टी करप्शनमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील आणि राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला.२००२ मध्ये ७५० मेट्रिक टन कचरा उचलला जात होता. २०१८ मध्येही तेवढाच कचरा उचलला जात आहे. २००२ मध्ये यासाठी भांडवली आणि महसुली खर्च हा ४२ कोटींच्या घरात होता, जो आज ६०० कोटींच्या घरात गेला आहे. कचरा वाढलाच नाही तर खर्च वाढला कसा असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे. २०१३ मध्ये पालिकेने उच्च न्यायालयात माहिती देतांना २०१९ पर्यंत आम्ही कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावू अशी हमी दिली होती. परंतु, एवढ्या वर्षात पालिकेला डायघरचे डम्पिंग ग्राउंड सुरू करता आले नाही, पाच ठिकाणी बायोमिथेनायझेशन प्लान्ट सुरू करण्यात येणार होते. परंतु,त्या जागासुद्धा पालिकेला ताब्यात घेता आलेल्या नाहीत. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन सोसायटीवाल्यांना केले जात आहे. तो वेगळा जमा होत असला, तरी घंटागाडीमध्ये एकत्रच जमा केला जात आहे. तोच कचरा पुढे सीपी तलावाला एकत्र टाकला जात असून पुढे तो दिव्याला पाठविला जात आहे. असे असतांनाही पालिकेच्या माध्यमातून आता सोसायटीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातही उपविधीचा ठराव मंजूर झाल्यानंतर वाढीव दर असल्याने त्याचा विरोध झाला होता. त्यानंतर एक वर्षापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली. आता वर्ष संपत आले असतांना पुन्हा अशा प्रकारे नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. हे करीत असतांना आधी पालिकेने सुविधा द्याव्यात, मगच वसुली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मात्र सोमवारी झालेल्या महासभेत अद्याप दर निश्चित केले नसून पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा होऊन ते निश्चित झाल्यावर तसा प्रस्ताव पुन्हा महासभेच्या पटलावर ठेवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.कामगार कमी, पगार जास्तघंटागाडीवरील कामगारांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात जे कामगार कामावर नाहीत, त्यांचे पगार सुद्धा काढले जात असल्याची बाब समोर आली आहे. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, त्याला इतर ठिकाणी काळ्या यादीत टाकले आहे. असे असतांनाही त्याला पालिकेने ठेका दिला आहे. घंटागाडीच्या फेºयांमध्येच दिवसाला पाच ते सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.बिगर तांत्रिक कर्मचाºयांचा सहभागघनकचरा विभागात काम करणारे अधिकारी हे टेक्निकल पर्सन असणे अपेक्षित आहे. परंतु,अशोक बुरपुल्ले आणि बालाजी हळदेकर नॉन टेक्निकल पर्सन असूनही ते या विभागात काम करीत आहेत. हळदेकर तर डॉक्टर असून त्यांच्यावर वारंवार कारवाईची मागणी करूनही अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाहीत.कचºयावरच शिवसेनेचे पोषण- आनंद परांजपेघनकचरा व्यवस्थापनामधून पैसा कमावणे हेच शिवसेनेचे धोरण आहे. त्यामुळे ही संघटना कचºयावरच पोसली जात असून त्यांच्यासाठी कचरा हे कुरण असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला. आजवर टक्केवारीवरच शिवसेनेचे पालपोषण झालेले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांच्या माथी कचरा कर मारून त्यातून स्वत:चा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे