शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्यास कठोर कारवाई करणार: पोलीस आयुक्तांचा इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: March 23, 2020 21:59 IST

अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. आता राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देधार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाण्याला बंदीखासगी वाहनांच्या वापरावरही निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या विषाणूचे वेगाने होणारे संक्र मण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाकडून घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असेही आवाहन केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.संपूर्ण देशभरात २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते. या आवाहनाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रविवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी शिथिल होताच सकाळी ७ ते १० वाजण्याच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. अनेकांनी केवळ बाहेर काय चाललय? कलम १४४ म्हणजे नेमकी काय असते? हे अजमविण्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दुचाकी किंवा आपल्या खासगी मोटार कारने बाहेर पडले.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य केले नाही तर त्यांना घरी बसविण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागेल. अगदीच नाईलाज झाला तर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही फणसळकर यांनी दिला आहे.राज्यात कलम १४४ लागू केलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सोमवारी सकाळी लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, मानपाडा, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा या भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे चित्र होते. त्याचवेळी ठाण्यातून मुंबईत प्रवेश करण्याच्या मुलूंड चेक नाक्यावरही सकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ठाण्यातूनही बाहेर पडलेल्या वाहन चालकांकडे मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यामुळे सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेक नाका येथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. ठाणे पोलिसांनीही या वाहतूक कोंडीची दखल घेत त्याठिकाणी कारवाई केली. त्यानंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली.* अनेक ठिकाणी नागरिक वेगवेगळया धार्मिक ठिकाणी प्रार्थनेसाठी एकत्र येत आहेत. मनाई आदेश तसेच संचारबंदी असूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. त्यामुळे या प्रार्थनास्थळांवर पूजारी, मौलाना आणि धर्मगुरु यांच्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना जाण्यास बंदी केली आहे.* खासगी वाहनांच्या वापरावर बंदीरेल्वे, एसटी आणि सार्वजनिक बस सेवा बंद असल्यामुळे अनेक नागरिक हे विनाकारण खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. यात फरक पडला नाहीतर अशा वाहनांच्या वापरावरही पूर्णपणे बंदी केली जाणार असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या