शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्यास कठोर कारवाई करणार: पोलीस आयुक्तांचा इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: March 23, 2020 21:59 IST

अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. आता राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देधार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाण्याला बंदीखासगी वाहनांच्या वापरावरही निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाच्या विषाणूचे वेगाने होणारे संक्र मण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना प्रशासनाकडून घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असेही आवाहन केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.संपूर्ण देशभरात २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले होते. या आवाहनाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रविवारी रात्री ९ ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी शिथिल होताच सकाळी ७ ते १० वाजण्याच्या सुमारास अनेकजण घराबाहेर पडले. अनेकांनी केवळ बाहेर काय चाललय? कलम १४४ म्हणजे नेमकी काय असते? हे अजमविण्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दुचाकी किंवा आपल्या खासगी मोटार कारने बाहेर पडले.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सहकार्य केले नाही तर त्यांना घरी बसविण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे लागेल. अगदीच नाईलाज झाला तर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही फणसळकर यांनी दिला आहे.राज्यात कलम १४४ लागू केलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सोमवारी सकाळी लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, मानपाडा, घोडबंदर रोड, कळवा आणि मुंब्रा या भागात नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे चित्र होते. त्याचवेळी ठाण्यातून मुंबईत प्रवेश करण्याच्या मुलूंड चेक नाक्यावरही सकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ठाण्यातूनही बाहेर पडलेल्या वाहन चालकांकडे मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यामुळे सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आनंदनगर चेक नाका येथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. ठाणे पोलिसांनीही या वाहतूक कोंडीची दखल घेत त्याठिकाणी कारवाई केली. त्यानंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली.* अनेक ठिकाणी नागरिक वेगवेगळया धार्मिक ठिकाणी प्रार्थनेसाठी एकत्र येत आहेत. मनाई आदेश तसेच संचारबंदी असूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. त्यामुळे या प्रार्थनास्थळांवर पूजारी, मौलाना आणि धर्मगुरु यांच्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना जाण्यास बंदी केली आहे.* खासगी वाहनांच्या वापरावर बंदीरेल्वे, एसटी आणि सार्वजनिक बस सेवा बंद असल्यामुळे अनेक नागरिक हे विनाकारण खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. यात फरक पडला नाहीतर अशा वाहनांच्या वापरावरही पूर्णपणे बंदी केली जाणार असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या