शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 03:35 IST

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती.

- स्नेहा पावसकरठाणे : भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. आपल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे; पण देशात खूप गरीबी आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळत नाही. अस्वच्छता, धूम्रपान या प्रमुख समस्या आहेत. विचारांचे हे ‘स्वातंत्र्य’ पाहायला मिळाले ते सिग्नल शाळेतील अवघ्या १0 ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी व्यक्त केलेल्या निखळ भावनांमध्ये.गेली अनेक वर्षे समाजातील सोयीसुविधांपासून दूर असलेली ही मुले ठाण्यातील तीनहातनाका येथे सुरू झालेल्या सिग्नल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आलीत. सिग्नलवर केवळ झेंडे विकणे आणि शक्य झाल्यास दूर उभे राहून एखादा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पाहणे, इतकेच त्यांच्या नशिबी असायचे. आजही आम्ही झेंडे घेऊन येतो. ते सिग्नलवर विकतो; मात्र शाळा सुटल्यावर. झेंडा विकताना त्याचे व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आम्हाला माहित आहे. सिग्नल शाळेत प्रवेश घेतल्यापासून आम्ही आमच्या शाळेत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करू लागलो आहोत. आम्ही झेंड्याला सलामी देतो, लेझीम खेळतो, ध्वजगीतासह स्वातंत्र्य दिनाची गाणी म्हणतो. त्यावेळी खूप आनंद होतो, असे सिग्नल शाळेतील मुले म्हणाली.आज देशात अनेकांना राहायला स्वत:ची घर नाहीत. लोकं खूप गरीब आहेत. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतयं. धूम्रपानची समस्या आहे. या समस्या संपल्या पाहिजे. आम्हाला शिक्षणाची सोय उपलब्ध झाली; पण आजही अनेक मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यांच्या आईवडिलांनी मुलांना शिकविले पाहिजे. शिक्षण सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला शिक्षण घ्यायला खूप आवडते. शिकून पुढे पोलीस, पायलट, इंजिनिअर व्हायचं आहे, अशी या चिमुकल्या डोळ्यांनी रंगवलेली स्वप्नेही सांगितली.मोदींना ओळखतात; बाळासाहेब आवडीचे नेतेसिग्नल शाळेतील ही मुले केवळ अभ्यासातच नव्हे तर सामान्य ज्ञानातही हुशार आहेत. देशाचे पंतप्रधान कोण आहेत, असे विचारले असता, क्षणाचा विलंब न करता अनेकांनी नरेंद्र मोदीअसे तर महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे, ठाण्यातले एकनाथ शिंदेही आम्हाला माहित आहेत आणि आवडतातही, असेही काही मुले यावेळी उत्तरलीत.पैसे कमवायचे असतात ना...स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी सिग्नलवर विकण्यासाठी आम्ही स्वत: आणि अनेकदा एकट्याने कुर्ला किंवा इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये जाऊन झेंडे आणतो. आम्हाला ते कमी किमतीत मिळत असले तरी आम्ही २० रूपयाला विकतो. कारण त्यातून पैसे कमवायचे असतात ना... असे उत्तर निखळ मनाने एका मुलाने दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी