शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

By अजित मांडके | Updated: May 30, 2024 13:11 IST

ठेकेदारांच्या मनमर्जीनुसार निविदा काडून सुद्धा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा

ठाणे  :  ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली असल्याचे दाखविले जात असले तरी ३१ मेच्या आधी नाले सफाई पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील गांधीनगर, कापूरबावडी, नलपाडा, लोकउपवन, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर,वागळे इस्टेट येथील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्यांचा ढीग साचलेलाच दिसून येत असून ठेकेदाराने नालेसफाई त्वरीत न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.महापालिका हद्दीत सुमारे ३०८ किमी अंतराचे १२९ छोटे व मोठे नाले आहेत. ठाण्यातील नालेसफाई व्यवस्थितरित्या व्हावी, यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये नाल्यांच्या सफाई संदर्भात काही अटी व शर्ती लागू केल्या होत्या. पण ठेकेदारांनी संगनमत करून या अटी व शर्ती हटवण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडले. असे करून सुद्धा ठाण्यातील नाल्यांची सफाईची परिस्थिती बघितल्यास बहुतेक नाल्यांमध्ये कचरा तसाच असून ठेकेदार फक्त हाथ सफाई करत असल्याचा  स्वप्निल महिंद्रकर यांनी आरोप केला आहे.दर वर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्यात येते तसेच वर्षभर है नाले साफ ठेवण्याचे काम घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, पावसाळ्यापूर्वी घन कचरा विभागामार्फत नाल्यांची काटेकोर सफाई केली जात नसल्यामुळे  पावसाळ्यात पाणी साठून ते घरांमध्ये शिरते. याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असून नाले सफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्या येतात. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असूनही ते होत नसल्याचे वास्तव आहे. ठाण्यातील नाले साफसफाई म्हणजे केवळ हात सफाई असल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील दरवर्षी कुठलीही कारवाई ठेकेदारांवर केली जात नसल्यामुळे ठेकेदार सुद्धा बिंदिक्तपणे सफाई कामात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे.ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या होण्याच्या अनुषंगाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम करण्यात येऊन सुद्धा ठाण्यातील नाल्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. दरवर्षी करोडो रुपये नालेसफाईच्या नावावर मंजूर केले जातात. मात्र अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून काम न करताच पैशांची बिलं काढण्यात आपली धन्यता मानता.( स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे)

आम्ही या विभागात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहत असून येथे नालेसफाई न झाल्यामुळे लोकांच्या घरी पाणी घुसते व त्यामुळे येथे डेंगू मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात व त्याचा नाहक त्रास आम्हाला भोगाव लागतो. मनीष सावंत, स्थानिक नागरिक. गांधीनगर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका