शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संचारबंदीतही मॉर्निंगवॉकवाले सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:39 AM

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा ...

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. गांभीर्य नसलेले ठाणेकर मॉर्निंग वॉकला उतरल्याचे दिसून आले. त्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठवले. तर रेल्वेच्या तिकीट खिडकीवर आणि रेल्वेतही नेहमीप्रमाणे गर्दी हाेती. तर मार्केटमध्येही भाजी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. दुसरीकडे पोलिसांचे लसीकरण सुरू झाल्याने नाकाबंदीतही काहीशी शिथिलता दिसली.

राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही संचारबंदीचा फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. पहाटेच जांभळी नाक्यावर तलावाभोवती मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या नागरिकांना समज देऊन घरी पाठविले. अशीच काहीशी परिस्थिती घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागातही हाेती. तेथेही मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडले होते. दुसरीकडे, मार्केट परिसरही सुरू होता. बॅरिकेड्स लावण्यात आले असतानाही मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक जात होते. तसेच सार्वजनिक वाहतूक बस, रिक्षांतही गर्दी दिसत होती. त्यामुळे संचारबंदी आहे का, असा सवाल उपस्थित होत होता. दुसरीकडे रेल्वे तिकीट खिडकीवरही नेहमीप्रमाणे रांगा दिसत होत्या. रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यूआर कोड तपासताना दिसत नव्हते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाने ये-जा

ठाणे शहरातील जांभळी नाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत होते. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावले होते. तरीही पळवाटा काढत काही नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देत येथे ये-जा करत होते. शहरातील इतर ठिकाणीही नागरिकांची तुरळक वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केट नेहमीप्रमाणे सुरू होते.