शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मीरा भाईंदर मनपाची अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ

By धीरज परब | Updated: April 8, 2025 15:15 IST

Mira Bhayandar Municipal Corporation: सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी १७ डिसेम्बर २०२४ रोजी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, शासन आदींना बंधनकारक आहे. मात्र ४ महिने व्हायला आले तरी मीरा भाईंदर महापालिकेने अमलबजावणी न करता उलट शासनास पत्र पाठवून टाळाटाळ चालवली आहे. 

मीरारोड - सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी १७ डिसेम्बर २०२४ रोजी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण, शासन आदींना बंधनकारक आहे. मात्र ४ महिने व्हायला आले तरी मीरा भाईंदर महापालिकेने अमलबजावणी न करता उलट शासनास पत्र पाठवून टाळाटाळ चालवली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दाखल दोन याचिकांवर आदेश देताना अनधिकृत बांधकाम बाबत कार्यवाहीचे आदेश १७ डिसेम्बर २०२४ रोजी दिलेले आहेत. सदर आदेश सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था सह शासकीय विभागांना बंधनकारक आहे. परंतु तसे असताना मीरा भाईंदर महापालिकेने अजूनही त्याची काटेकोर अंलबजावणीच सुरु केलेली नाही. 

अनधिकृत बांधकामे केवळ तेथे राहणा-या लोकांच्या आणि आसपासच्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करीत नाही, तर वीज, भूजळ आणि रस्त्यांवरील प्रवेशासारख्या संसाधनांवरही परिणाम करतात. संसाधने प्रामुख्याने सुव्यवस्थित विकास आणि अधिकृत उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उ‌द्देश असतात. प्रादेशिक योजना किंवा क्षेत्रीय विकास केवळ वैयक्तिक स्वरुपाचा असू शकत नाही, तर तो व्यापक जनहित आणि पर्यावरणाचा विचार करून तयार केला गेला पाहिज असे परखड मत न्यायालयाने नोंदवलेले आहे. 

न्यायालयाच्या आदेशा नुसार, इमारतींना बांधकाम परवानगी देताना विकासक,अर्जदार यांच्याकडून भोगवटा प्रमाणपत्र संबंधित प्राधिकरणाकडून प्राप्त झाल्यानंतरच इमारतीचा ताबा जागा मालक वा सदनिका मालक यांना सोपवला जाईल असे हमीपत्र घेण्यात यावे.  संपूर्ण इमारत बांधकामाच्या कालावधी दरम्यान मंजूर नकाशाची प्रत बांधकाम स्थळी प्रदर्शित करायची आहे. संबंधित प्राधिकरणाने वेळोवेळी सदर परिसराची तपासणी करून त्याचा अहवाल कार्यालयाच्या नोंदवहीमध्ये नोंद करायचा आहे.  

बांधकामाची व्यक्तीशः तपासणी करून, सदर बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने बांधकाम झाले आहे किंवा कसे? याची खात्री झाल्यानंतरच, विनाविलंब रहिवासी वा व्यावसायिक इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र द्यायचे आहे. मंजूर नकाशा नुसार बांधकाम न केल्याचे निदर्शनास येताच कायद्‌यातील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही आवश्यक आहे.  जोपर्यंत मंजूर नकाशाचे उल्लंघन केलेले बांधकामात सुधारणा करीत नाहीत तो पर्यंत भोगवटा दाखला देण्यात येऊ नये.

इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच सेवा पुरवठादार यांनी वीज जोडणी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण जोडणी इत्यादी सेवा पुरवायच्या आहेत. भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर बांधकाम परवानगीचे उल्लंघन आढळून आले तर तात्काळ विकासक, मालक, रहिवासी यांच्यावर कायदेशिर कारवाई करायची आहे. चुकीच्या पध्दतीने भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केलेल्या जबाबदार अधिका-याविरुध्द तात्काळ विभागीय कार्यवाही करायची आहे. 

कोणत्याही रहिवास वा व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत इमारतीत व्यवसाय करण्या करता स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी कोणताही परवाना देऊ नये.  कोणत्याही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित प्राधिकरण  सहकार्याची विनंती करेल तेव्हा अन्य प्राधिकरणांनी त्वरित आवश्यक मदत करायची आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास गांभीर्याने घ्यावे. संबंधित दोष अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करायची आहे. 

जागा मालक - विकासक यांनी भोगवटा दाखला, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न दिल्याच्या तसेच अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या किंवा मंजूर नकाशाचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामात दुरुस्ती करण्याकरीत केलेल्या अर्जास मंजूरी न दिल्याच्या विरोधात, कोणताही अर्ज,अपील,पुनरावलोकन अर्ज दाखल केल्यास ९० दिवसांच्या मुदतीत निकाली काढणे बंधनकारक आहे. .

न्यायालयाच्या वरील आदेशा नुसार महानगरपालिकेने अंमलबजावणी करण्याबाबत आदेश पारीत करण्यात येणार आहेत. सदन आदेश पारीत झाल्यास महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांना पाण्याची नळ जोडणी, विविध प्रकारच परवाने, मलनिस्सारण जोडणी, वीज जोडणी पुरविता येणार नाही. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम विरोधात कार्यवाही न केल्यास दोषीवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे असे  महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर यांनी ६ मार्च २०२५ रोजी च्या पत्रा नुसार शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना कळवले आहे..

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्पष्ट असताना देखील त्याची अमलबजावणी करण्या ऐवजी ३ महिन्यांनी शासनास पत्र पाठवून त्यात न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणीसाठी पारित करायचे आदेश व वस्तुस्थिती शासनास अवगत करण्यात येत असल्याचे बांगर यांनी नमूद केले आहे.  एकंदर शहरातील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे असलेले संरक्षण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय