शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

ग्रामपंचायतींनी अडीच कोटी जमा करूनही औषध खरेदी नाही; शासनाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 06:39 IST

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खरेदी अत्यावश्यक

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींकडील दोन कोटी ६४ लाख रुपये जिल्हा परिषदेने जमा करून राज्य शासनाकडे जमा केले आहेत. कोरोनाच्या महामारीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातही उच्चांक गाठला आहे. ठाणे ग्रामीण भागात बाधितांची संख्या चार हजार ३५ तर मृतांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. मात्र, अजूनही आवश्यक औषधांची खरेदी झाली नाही. त्यास आता विरोध होऊ घातला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी १३ व्या वित्त आयोगाचा खर्च न झालेला निधी व १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज आदी करोडोंची रक्कम प्रशासनाने जमा करण्याचे आदेश राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या प्रशासनाला दिले आहेत. यानुसार ठाणे जिल्हा परिषदेने अंमलबजावणी केली. त्यात १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चीक निधी ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे शिल्लक नाही. मात्र व्याजाचे दोन कोटी ६४ लाख रुपये जिल्हाभरातून शासनास जमा झाले आहेत, पण त्यातून अद्यापही ग्रामस्थांना औषधपुरवठा झालेला नसल्याचे उघडकीस आले आहे.

होमिओपॅथीचे अर्सेनिक अल्बम ३० व संशमनीवटी हे आयुर्वेदिक औषध खरेदी करून ते गावकऱ्यांना वाटप करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा अधिक कुटुंबांतील तब्बल १२ लाख गावकरी, महिला, युवा, युवती, वयोवृद्धांना त्याचे वाटप होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून ही दोन कोटी ६४ लाखांची रक्कम शासनाने जमा करून घेतली.

एक महिन्यापासून जमा झालेल्या या रकमेतून ही औषधी राज्य शासनाने आतापर्यंत खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाच्या निष्काळजीमुळे ही अत्यावश्यक खरेदीही रखडली आहे. आता ही औषध खरेदी जिल्हा परिषदेनेच करून त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मागावा, असा फतवा राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे या खरेदीला पुन्हा विलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या औषध खरेदीविषयी तर्कवितर्क काढले जात आहेत.

जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडे ग्रीन झोनमध्ये आनंदी जीवन जगत आहेत. कोरोनाची साथ आता संपण्याच्या मार्गावर आहे. एवढा मोठा कालावधी संपत आलेला असतानाही ग्रामस्थांना औषधपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्रनापसंती आहे.

काही ग्रामपंचायतींनी ही रक्कम वेळेत जमा न केल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची भीती घातली होती. या भीतीपोटी ग्रामपंचायतींनी लाखोंच्या रकमा जमा केलेल्या आहेत. गाव, पाडे आणि खेड्यांच्या विकासाचा हा एकमेव निधी प्रशासनाने जमा करून घेतला आहे.

तो ग्रामपंचायतींना परत द्या, या मागणीसाठी बहुतांशी सदस्यांनी व सरपंच यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना साकडे घातले आहे. मात्र,अद्यापही त्यावर सकारात्मक चर्चा न झाल्याने राज्य शासन व प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे