शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, ...

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवार रात्रीपासून एकूण ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी काही इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. कल्याण पूर्वेतील दोन अतिधोकादायक इमारतींतील २८ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले, तर डोंबिवली पश्चिमेतील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. अन्य पाच इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतींपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या आहेत. आठ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरू आहे. ‘अ’ प्रभागात टिटवाळा परिसरातील एक अतिधोकादायक इमारत रहिवासमुक्त केली आहे. जोरदार पावसामुळे मनपा हद्दीतील सखल भागांत पाणी साचल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मनपाने मनुष्यबळासह जेसीबीद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्याचे काम केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पावसाचा आढावा घेतला. महापालिकेतील २०१ ठिकाणी असलेल्या ५५१ सीसीटीव्हीच्या साहाय्याने पाणी कुठे साचले आहे, याचे अवलोकन करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

------------------