शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 02:56 IST

भिवंडीतील कोरोना परिस्थितीचा आढावा

भिवंडी : कोरोनाच्या चाचणीसाठी नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालय व जिल्ह्यातील एमएमआर क्षेत्रात पाच ठिकाणी मुंबईप्रमाणे सुसज्ज लॅब सुरु केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता अहवालासाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागणार नाही. या लॅबमध्ये मोफत तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात १५ दिवसात ही प्रयोगशाळा सुरु होणार आहे. अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहापूर येथे प्रयोगशाळा सुरु केल्या जातील असे त्यांनी सांगितले. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टोपे यांनी गुरुवारी भिवंडी महापालिकेस भेट देऊन कोरोना संदर्भातील आढावा घेतला. यावेळी शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी लागणारा निधीही मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती दिली. शहरातील एकमेव कोविड रुग्णालयाचा वाढता ताण लक्षात घेता या रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची लवकरच भरती केली जाणार आहे. इंदिरा गांधी कोविड रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून २८ रुग्णवाहिकाही शहरासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्ह्यात होणार मल्टिस्पेशालिटी रुग्णालयभिवंडीकरांनी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास घरात न थांबता त्वरित उपचारासाठी रुग्णालयात जावे, जेणेकरून नागरिकांवर वेळेत उपचार करून कोरोनावर मात करता येईल असे आवाहनही रोजेश टोपे यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयही लवकरच उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्ह्यातील बेडसाठी डॅशबोर्ड : एमएमआर रिजनमध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची रोजची अपडेट जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करून त्यावर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश टोपे यांनी दिले. कोरोनाचे रुग्ण सापडल्यावर त्यासलंग्न असलेल्या रुग्णांची ट्रेसिंग करण्याच्या सुचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत. अलगीकरण कक्ष वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या परिसरातील महाविद्यालय, हॉटेल आदी सर्व आस्थापनांशी चर्चा करून त्या जागा ताब्यात घेण्यावर भर देण्यासही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे