शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला, मॉलमधील खरेदीला पसंती, कापडखरेदीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 2:46 AM

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते. या खरेदीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. खरेदीसाठी ग्राहकांकडून मॉल्सला पसंती दिली जात आहे. हा मॉलखरेदीचा ट्रेण्ड शहरातील दुकानदारांना मारक ठरला आहे. विशेषत: कपडे विक्री करणाऱ्या दुकानदारांना याचा फटका जास्त बसला आहे.डोंबिवलीतील तयार कपडेविक्रेते प्रकाश सतरा यांनी सांगितले की, सध्या मॉलमध्ये खरेदीचा ट्रेण्ड असल्याने बाजारातील कपडेविक्रेत्यांच्या दुकानाला फटका बसला आहे. यंदाच्या दिवाळीत खरेदीचे प्रमाण ६० टक्के घटले आहे. इतक्या वर्षात एवढी घट कधीच आली नाही. कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच मुंबईतील मॉलमध्ये जाऊन लोक दिवाळीची खरेदी करत आहेत. कपडेखरेदीचा कल मॉलकडे झुकला असल्याने आमच्यासारख्या दुकानदारांचे दिवाळीत मरण झाले आहे. त्यात कपडेविक्रीवर १८ टक्के जीएसटी आहे. त्यामुळेही धंद्याला झळ बसली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आमच्यासाठी निराशाजनक आहे.अन्य एक कापडविक्रेते अमित होरा म्हणाले खरेदीचे प्रमाण सध्या तरी कमी आहे. सोमवारपासून खरेदीला जोर येईल. कपड्यांमध्ये नवीन पॅटर्न आलेले आहेत. यंदा कपडेविक्रीत भाववाढ नाही. धंदा कमी आहे.रांगोळी आणि रंगावलीरांगोळीविक्रेते मधुकर काळे यांनी सांगितले की, रांगोळीचा मोठा ग्लास १० रुपये, लहान ग्लास पाच रुपये किमतीला आहे. रंगीत रांगोळीचे एक पाकीट १० रुपये आहे. त्यात विविध रंग आहेत. पूर्वी प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रांगोळी व रंग एकत्र करून विकले जात होते. प्लास्टिकबंदीमुळे ते आता विकले जात नाहीत. हे रंग ग्लासमध्ये तयार असल्याने वापरणे सोयीचे जात होते. रांगोळीच्या एका गोणीमागे २५ रुपये वाढले. सफेद रंगाच्या गोणीमागे ४० रुपये भाववाढ झाली आहे. तरीदेखील, ग्राहकाला रांगोळी विकताना भाववाढ केलेली नाही. मागच्या वर्षी दिवसाला एक हजार रुपये धंदा व्हायचा. सध्या दिवसाला ५०० रुपयेही धंदा होत नाही.कंदील आणि पणत्या : छोटे कंदील ६० रुपये डझन, एक नग १० रुपयांना आहे. पणतीस्टॅण्ड १०० रुपयांना असून मेणाची पणती आणि चिनी मातीच्या साध्या पणत्याही आहेत. दोन्ही प्रकारच्या पणत्यांना मागणी आहे. महिला बचत गटाच्या संध्या काळे यांनी सांगितले की, जेल आणि मेणाच्या पणत्या विकल्या जात आहेत. जेल आणि फॅन्सी पणतीची किंमत १०० रुपये आहे. कंदील १०० ते ५०० रुपयांना आणि मणी तोरण २०० ते ६०० रुपयांचे आहे. विक्रेते आनंद पवार यांनी सांगितले की, विजेच्या दिव्यांचे तोरण ८०० रुपयांना असून एक दिवा १५० रुपयांना विकला जात आहे.इकोफ्रेण्डली कंदीलप्लास्टिक व थर्माकोलबंदीमुळे बाजारात प्लास्टिक व थर्माकोलचे आकाशकंदील नाहीत. त्यामुळे कागदी कंदील व त्यावर सोनेरी किनार असे कंदील बाजारात आहेत. कागदी कंदिलांना बाजारात जास्त मागणी आहे. लोकांचा कल बदलतोय, ही समाधानकारक बाब कंदीलविक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. कागदी कंदील ६०० ते ८०० रुपयांना विकला जात आहे. आइस्क्रीमच्या कांडीपासून आणि वुली पेपरने इकोफ्रेण्डली कंदील तयार करणारे विनायक बुदूर यांनी सांगितले की, इकोफ्रेण्डली कंदिलांना जास्त मागणी आहे. कंदील इकोफ्रेण्डली असले, तरी त्यात भाववाढ नाही. २०० ते ६०० रुपये एका कंदिलाची किंमत आहे.कुछ मिठा हो जाए...दुर्गाराम मेढिया यांनी सांगितले की, चॉकलेट खरेदी केले जातात. विशेषत: भेटवस्तू दिली जाते. १०० ते ५५० रुपयांपर्यंत चॉकलेट आहेत. चॉकलेटला जास्त मागणी आहे. सोनपापडी, रसगुल्ला, बदामहलवाही आहे. ड्रायफू्रट लहान आकाराचे पॅकेट २०० रुपये ते ६५० रुपयांचे आहे. काजू, मनुके, खारीक, मावा चेरी हे सुट्या पद्धतीने फराळासाठी घेतले जाते. त्याचे प्रमाण कमी आहे. त्यात एक ते दीड टक्का भाववाढ झालेली आहे.केरसुणीलक्ष्मीपूजनासाठी केरसुणी खरेदी केली जाते. तिचे पूजन केले जाते. एरव्ही, फेरी करून केरसुणी विकणाºया लक्ष्मी आरावटे यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून त्या केरसुणी विकतात. बाजारात प्लास्टिक केरसुण्या आहेत. त्यांचा पूजेसाठी वापर केला जात नाही. नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुणीचे पूजन केले जाते. लहान आकाराची केरसुणी जी पूजेसाठी वापरली जाते, तिची किंमत १५ रुपये आहे. यात भाववाढ नाही.लाह्या, बत्ताशे :लक्ष्मीपूजनासाठी लागणाºया लाह्या व बत्ताशांचे एक पाकीट १० रुपयांना आहे. यंदा माल जास्त विक त घेतला आहे. त्याची विक्री झालेली नाही. त्यामुळे तो अंगावर पडण्याची शक्यता आहे. तीन दिवसांत धंदा झाला तर होईल, अशी माहिती बत्ताशेविक्रेते बसवराज यांनी दिली आहे.फराळ :सुनील शेवडे यांनी सांगितले की, फराळात चकली, चिवडा, अनारशांना मागणी आहे. सगळ्यात जास्त मागणी बेसन लाडूला आहे. फराळाला आॅर्डर असते. सोमवारपासून फराळविक्री होणार नाही. माल संपलेला असेल. आताच्या पिढीला फराळाचे अप्रूप नाही. जुन्या पिढीला फराळाशिवाय दिवाळी झाल्यासारखे वाटत नाही. फराळ हीच दिवाळीची खरी ओळख आहे. 

टॅग्स :thaneठाणेDiwaliदिवाळी