शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आंदोलनामुळे हटविले अतिक्रमण; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 1:13 AM

नेहमी व्हायची वाहतूककोंडी

वाडा : वाडा शहरातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत होता. प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी गेल्या सोमवारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

या उपोषणाची त्याच दिवशी दखल घेऊन येत्या काही दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने बुधवारी हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. या गटारावर हातगाडीवाले, फेरीवाले, फळ, भाजी, मासळी विक्रेते आदी व्यावसायिकांनी बसून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी किरकोळ अपघात घडतात. तसेच खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करत वस्तू खरेदी करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व तहसीलदार प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते डोळेझाक करीत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल मोरे व फयेज शेख यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाची तत्काळ दखल घेत आज पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.